मुंबई : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये मंगळवारी पहाटे हवाई हल्ला करत जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उध्वस्त केले या हल्ल्यात ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या हल्ल्यानंतर भारतात सर्वत्र जल्लोष झाला. देशवासी, नेते आणि कलाकारांनी या दमदार कारवाईचे जल्लोषात स्वागत केले. या स्वागत करणाऱ्यांमध्ये भाजपाचे खासदार आणि अभिनेते परेश रावल यांचेही नाव होते.
Now speechless!!! https://t.co/cY8RrkfAgh
— Paresh Rawal (@SirPareshRawal) February 26, 2019
भारतीय हल्ल्याच्या कारवाई नंतर परेश रावल यांनी ट्विट करत म्हणाले, ही ख-या अर्थाने चांगली सकाळ होती यानंतर परेश रावल यांनी आणखी एक ट्विट करत थेट पाकिस्तानी कलाकारांच्या मर्मावर घाव घातला. पाकिस्तानी अभिनेता गायक अली जफरला त्यांनी जोरदार टोला लगावला होता. ‘आता बोलती बंद झाली का ?’ असे ट्विट करत त्यांनी अली जफरवर निशाणा साधला आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणावर पाकिस्तानी गायक अली जफरने ‘व्हॉट अ स्पीच’ असे ट्विट करत कौतुक केले होते. आता त्याच्या याट्विटला परेश रावल यांनी रिट्विट करत नि:शब्द’ असे ट्विट केले.