प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी ते सांगलीत आले होते यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, ” सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक तयारीची जबाबदारी माझ्याकडे आहे.त्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटी मी घेत आहे. यातील अनेक कार्यकर्ते मागील निवडणुकीची वस्तुस्थिती आता सांगत आहेत. मराठी माणूस पंतप्रधान होणार,माढा लोकसभा मतदारसंघाचा बारामती शहराचा शांघाय शहराप्रमाणे विकास करणार अशी मोठी मोठी स्वप्ने दाखवली. त्यामुळे आम्ही मतदान केंद्रावर भाजपच्या कार्यकर्त्यांना येऊ दिले नाही. मोठ्या प्रमाणात बोगस मतदान केले, असे पदाधिकारी, कार्यकर्ते सांगत आहेत. त्यावेळी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे मी तक्रारही केली होती. मात्र, माझ्या तक्रारीची त्यावेळी दखल घेतली गेली नाही.पण दाखवलेल्या स्वप्नांपैकी एकही स्वप्न पूर्ण झाले नाहीअसेही ते म्हणाले .
तर माढ्यातून लढण्यास तयार …