‘ते’ दोघे रस्ता भरकटले सहा तासानंतर व्हाट्सऍपमुळे आई-वडिलांना परत मिळाले

पिंपरी-चिंचवड :  पोलीसनामा ऑनलाईन
कृष्णा पांचाळ

धुळे जिल्ह्यात मुलं पळवणारी टोळी म्हणून गावातील नागरिकांनी अनोळखी पाच जणांची दगडाने ठेचून हत्या केली होती.हत्या होण्या अगोदर व्हाट्सऍप वर मूल पळवणारी टोळी फिरत असल्याचे संदेश प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये आले होते.याच संशयावरून निरपराध पाच जणांची हत्या गावकऱ्याकडून झाली होती.त्यामुळे व्हाट्सऍप हे किती प्रभावी आहे याची प्रचिती आली,याचाच सकारात्मक प्रत्येय पिंपरी-चिंचवड मध्ये आला आहे.शुक्रवारी इयत्ता ६ वी च्या वर्गात शिक्षण घेणारे दोन विद्यार्थी रस्ता भरकटले आणि तब्बल सहा तास आई वडीलांपासून त्यांची ताटातूट झाली मात्र व्हाट्सऍप वरून दोन मुलं बेपत्ता असल्याचा संदेश वाऱ्यासारखा प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये पोहचला आणि सहा तासानंतर दोन्ही मुलं सुखरू आई-वडिलांना मिळाली.

प्रज्वल चंदनशिवे आणि रविराज सुरवसे हे दोघे काळेवाडी येथील इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेत इयत्ता ६ वीत शिक्षण घेत आहेत.नेहमी प्रमाणे दोघे मित्र हे शुक्रवारी सकाळी सात वाजता घरातून शाळेसाठी निघाले.दुपारी शाळा सुटल्यानंतर ते शहराच्या परिसरात फिरायला लागले.दोघे फिरत असताना रस्ता विसरले आणि भरकटले.त्यामुळे त्यांची चांगलीच पंचायत झाली.घरातील व्यक्तीना मुले आली नसल्याने चिंता वाटू लागली याची माहिती काही वेळातच सर्वाना मिळाली शोध मोहीम सुरू झाली तर्क वितर्क लावण्यात आले.घरातील व्यक्तीने व्हाट्सऍप वर काळेवाडीतील दोन मुलं बेपत्ता असल्याचा संदेश पसरवला आणि तो पाहता पाहता हजारो लाखो संख्येने पसरला.
[amazon_link asins=’B078LVWLJX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c1b2c446-9d21-11e8-93be-c9ffd283f3d8′]
याचा फायदा असा झाला की त्यावरून एका व्यक्तीने त्या दोघांना पिंपरी गावठाण येथे पाहिले याची माहिती प्रज्वल आणि रविराज यांच्या घरी देण्यात आली.आई-वडीलांपासून दुरावलेल्या दोघांना एकत्र आणण्याच काम व्हाट्सऍप ने केले.प्रज्वलची आई छाया चंदनशिवे यांनी बोलताना सांगितलं की पिंपरी येथे दोन्ही मुलं सुखरूप असून तुम्ही घेण्यासाठी या असा फोन आला होता.तातडीने तेथे जाऊन आपल्या मुलाला ताब्यात घेतले.
[amazon_link asins=’B072MFL2YF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d0204f61-9d21-11e8-aee6-2dc5e3fa8955′]
चंदनशिवे हे कुटुंब गेल्या वीस वर्षांपासून पिंपरी-चिंचवड येथे वास्थव्यास आहे.ते मूळ तुळजापूर येथील आहेत.प्रज्वल चे वडील खाजगी कंपनीत काम करतात.छाया चंदनशिवे यांना प्रज्वल व्यतिरिक्त एक मुलगी आहे.मात्र मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पायाखाली वाळू सरकली होती.मात्र मुलगा प्रज्वल मिळाल्यानंतर आईच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात होता.सोशीयल मीडियाचा वापर आपण कश्या प्रकारे करतो याच्यावर देखील खूप काही अवलंबून आहे,आलेला संदेश योग्य असल्याची खात्री करा आणि पुढे पाठवा जेणेकरून चांगल्या गोष्टी देखील घडतील.ज्या प्रकारे हे दोन्ही मुलं मिळण्यास सोशीयल मीडियाचा मोठा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही.व्हाट्सऍप चा योग्य वेळी योग्य वापर केल्यास चांगल देखील घडत असल्याचं या घटनेतून समोर आलं आहे.