PM-Kisan सन्मान निधी स्कीम : 3.78 कोटी शेतकर्यांच्या बँक अकाऊंटमध्ये पाठवले गेले 10-10 हजार रुपये, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्त संस्था – मोदी सरकारने देशातील 3.78 कोटी शेतकरी कुटुंबांना शेतीसाठी त्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत 10-10 हजार रुपयांचा मदत निधी जमा केला आहे. हे सर्व पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे लाभार्थी आहेत. हे ते लोक आहेत ज्यांना 1 डिसेंबर 2018 पासून स्कीम अंतर्गत पैसे मिळत आहेत. यांचा सर्व रेकॉर्ड ठेवण्यात आला आहे. मग तुम्ही उशीर का करत आहात, तुम्ही सुद्धा तुमचा रेकॉर्ड नोंदवा. आधार, बँक खाते आणि उत्पन्नाचा रेकॉर्ड योग्य असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे मिळतील.
पीएम शेतकरी योजनेत तीन हप्त्यात वार्षिक 6-6 हजार रुपये मिळतात. देशात 7.98 कोटी शेतकरी आहेत, ज्यांना तीन हप्ते मिळाले आहेत. सध्या याचा तिसरा हप्ता देण्याची तयारी सुरू आहे. 1 ऑगस्टपासून हे सुरू होईल. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत देशात आतापर्यंत 10 कोटीपेक्षा जास्त शेतकरी नोंदणीकृत झाले आहेत. आता केवळ 4.4 कोटी शेतकरीच यापासून वंचित आहेत.
तीन कागदपत्रांद्वारे करा रजिस्ट्रेशन
या स्कीम अंतर्गत कुटुंबाची व्याख्या पती-पत्नी आणि अल्पवयीन मुले आहे. यासाठी ज्या प्रौढ व्यक्तीचे नाव रेव्हेन्यू रेकॉर्डमध्ये नोदले गेले आहे ते याचा वेगळा फायदा घेऊन आपली शेती पुढे घेऊन जाऊ शकतात. याचा अर्थ असा आहे की, एकाच शेती योग्य जमीनीच्या भूलेख पत्रात जर एकापेक्षा जास्त प्रौढ व्यक्तींची नावे असतील तर योजनेंतर्गत प्रत्येक प्रौढ सदस्य वेगळा लाभ घेण्यास पात्र होऊ शकतो. यासाठी रेव्हेन्यू रेकॉर्डशिवाय आधार कार्ड आणि बँक खाते नंबर जरूरी आहे.
पैसे नाही मिळाले तर काय कराल
जर तुम्हाला पहिल्या आठवड्यात पैसे मिळाले नाहीत तर आपल्या लेखापाल आणि जिल्हा कृषी अधिकार्यांशी संपर्क करा. तेथे मदत मिळाली नाही तर केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून जारी टोल फ्री हेल्पलाइन (155261 किंवा 1800115526) वर संपर्क करा. तेथेही तुमचे काम झाले नाही तर मंत्रालयाच्या दुसर्या नंबरवर (011-24300606, 011-23381092) वर संपर्क करा.
(1) असे शेतकरी जे माजी किंवा सध्या संविधानिक पद धारक आहेत, वर्तमान किंवा माजी मंत्री आहेत, महापौर किंवा जिल्हा पंचायत अध्यक्ष आहेत, आमदार, खासदार आहेत त्यांना शेतकरी असले तरी या योजनेचा लाभ मिळणार नाही.
(2) केंद्र किंवा राज्य सरकारमधील अधिकारी आणि 10 हजारेपक्षा जास्त पेन्शन घेणारे शेतकरी यांना लाभ मिळणार नाही.
(3) व्यवसायिक, डॉक्टर, इंजिनियर, सीए, वकील, आर्किटेक्ट, जे शेती करत असले तरी त्यांना लाभ मिळणार नाही.
(4) मागील आर्थिक वर्षात इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी सुद्धा या लाभापासून वंचित असतील.
(5) केंद्र आणि राज्य सरकारचा मल्टी टास्किंग स्टाफ/चतुर्थ श्रेणी/गट डी कर्मचार्यांना लाभ मिळेल.