PM मोदींनी वर्षातील शेवटच्या ”मन की बात’ मधून जनतेला केलं ‘हे’ आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी (दि.27) 2020 मधील शेवटच्या ‘मन की बात’ मधून देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन, स्वच्छ भारत अभियान, कोरोना ते लोकल फॉर वोकल अशा अनेक विषयांवर जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वर्षा शेवटच्या ‘मन की बात’मधून (Mann ki Baat) जनतेला महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, चार दिवसानंतर नवे वर्ष सुरु होणार आहे. पुढच्या वर्षी पुढची मन क बात होईल. देशात नवे सामर्थ्य निर्माण झाले आहे. या नव्या सामर्थ्याचे नाव आहे ‘आत्मनिर्भर’. देशात निर्माण होणाऱ्या खेळांची आणि वस्तूंची मागणी वाढली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रेरणा देणाऱ्या तरुणांचा उल्लेख केला. कर्नाटकातील एका महिलेने श्वानासाठी खास व्हिचेअर तयार केली होती. तर एका जोडप्याने लग्नानंतर फिरायला जाण्याऐवजी बिच स्वच्छ करण्याचा संकल्प केला त्याबद्दल देखील मोदींनी कौतुक केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना आवाहन केले आहे. नव्या वर्षात आत्मनिर्भर, प्लास्टिकमुक्त भारत, लोकल फॉर वोकल, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर हे संकल्प प्रत्येक देशवासीयांनी करावेत.

पंतप्रधानांच्या भाषणातील ठळक मुद्दे
– पंतप्रधान मोदी म्हणाले, झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्टसह काम करण्याची वेळ आता आली आहे.
– कोरोनातून आपल्याला नवी गोष्टी देखील शिकायला मिळाल्या.
– अनेक आव्हान आणि समस्या निर्माण झाल्या मात्र एक आशेचा किरण आहे.
– लोकल फॉर वोकल आणि आत्मनिर्भर भारत करण्यासाठी देशातील स्थानिक उत्पादनांना चालना देणं गरजेचं आहे. त्यामुळे हे उत्पादन वाढवण्याचं आवाहन मोदींनी केलं.
– स्टर्ट अपसाठी प्रोत्साहन आणि स्थानिक वस्तूंना बाजारपेठा मिळाव्या यासाठी प्रयत्नशील.
– 2014 ते 2018 बिबट्यांची संख्या 60 टक्क्यांनी वाढली आहे. मध्य प्रदेशात ही संख्या जास्त वाढली आहे.