काही मूर्ख भारतीय म्हणत होते की PM मोदींनी पुलवामा हल्ला घडविला, PM इम्रान खान यांनी सांगितले खर्या गुन्हेगारांचे नाव
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी तसेच राजकीय नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करत त्यांनीच हा हल्ला घडवून आणल्याचे म्हटले होते. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे चाळीस जवान शहीद झाले होते. त्यामुळे भारतीयांनी मोठ्या प्रमाणात आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या हल्ल्याला प्रतिहल्ला दाखवून मोदी श्रेय घेत असल्याचे देखील विरोधकांनी म्हटले होते.
मात्र विरोधकांच्या या दाव्याला फोल ठरवणारे वक्तव्य पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केल्यामुळे विरोधी पक्षाच्या या आरोपातील हवाच निघून गेली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या विषयावर भाष्य करताना म्हटले कि, पुलवामा हल्ल्यामागील आरोपींचे नाव घेतले आहे. या विषयावर भाष्य करताना त्यांनी म्हटले कि, जैश-ऐ मोहम्मद यांनी हा हल्ला घडवून आणला आहे. अमेरिकेपासून हि गोष्ट लपवून ठेवण्यात आली होती. भारताने देखील हा हल्ला जैश-ऐ मोहम्मद ने केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुसेनेच्या विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून त्यांची तळे उध्वस्त केली होती. बालाकोट मध्ये घुसून हा हवाई हल्ला करण्यात आला होता. यानंतर विरॊधकानी मोदींवर टीका करत म्हटले कि, मोदींनीच हा हल्ला घडवून आणत त्याचे प्रत्युत्तर देत भारतीय लष्कराचे श्रेय घेण्याचे काम केल्याचा आरोप करण्यात आला होता.
दरम्यान, पंतप्रधान इम्रान खान यांच्या या वक्तव्यावर अमेरिका आणि भारताकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
- रोगप्रतिकारकशक्ती झटपट वाढवतील ‘हे’ १० साधेसोपे उपाय, जाणून घ्या
- एखाद्या स्त्रिला होणाऱ्या ‘या’ सामान्य समस्यांना आजार समजू नका
- तंदुरुस्त राहण्यासाठी आहारात करा ‘या’ पाच ‘सुपरफूड’चा समावेश
- महिलांकडून होऊ शकतात ‘या’ ९ प्रणय मिस्टेक्स, यामुळे वाढू शकतो दुरावा
- ‘या’ ३ पद्धतीने ७ दिवसात कमी होऊ शकतो फॅट, जाणून घ्या कोणती पद्धत
- मधुमेह रुग्णांसाठी ‘उंटिणीचे’ दूध फायदेशीर ; घ्या जाणून
- नाभीच्या इन्फेक्शनची समस्या दूर करतील ‘हे’ ७ घरगुती उपाय