Pune Police News | सावधान! आक्षेपार्ह पोस्ट कराल तर खबरदार, पुसेसावळीतील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | साताऱ्याच्या पुसेसावळीमध्ये सोशल मीडियाच्या (Social Media) पोस्टवरुन दोन गट आपापसांत भिडले. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता. हा तणाव निवळण्यासाठी आणि शांततेसाठी पुसेसावळी आणि आसपासच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद (Internet Service Off) करण्याचा निर्णय घेतला होता. पुसेसावळीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस देखील अलर्टवर आले आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात पोलिसांकडून (Pune Police News) सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
पुसेसावळीत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि जिल्ह्याभरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून पुणेकरांना करण्यात आले आहे. तसचे सोशल मीडियावरुन पुसेसावळीमध्ये इन्साग्रामवर आक्षेपार्ह पोस्टवरुन (Offensive Post) तणाव निर्माण झाला होता. याच कारणामुळे सोशल मीडियावरुन अफवा पसरवल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे पोलिसांकडून देण्यात आला आहे.
गणेशोत्सवात पोलिसांचा तगडा बंदोबस्त
येत्या काही दिवसात गणेशोत्सवाला (Ganesh Utsav) सुरुवात होत आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाला कोठेही गालबोट लागू नये यासाठी पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पुणे पोलीस सरसावले आहेत. शहरात कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पुणे पोलीस अलर्टवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
काय आहे पुसेसावळीची घटना?
साताऱ्याच्या पुसेसावळीमध्ये सोशल मीडियाच्या पोस्टवरुन दोन गट आपापसांत भिडले. या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला तर पंधराहून अधिकजण जखमी झाले आहेत. त्यामधल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर काही वाहनं पेटवण्यात आली, तर प्रार्थनास्थळांचीही जाळपोळ करण्यात आली. हा तणाव निवळण्यासाठी आणि शांततेसाठी पुसेसावळी आणि आसपासच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी या प्रकरणात 100 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Police News)
इन्स्टाग्राम पोस्टमुळे औंधमध्ये तणाव
दरम्यान, औंध पोलीस ठाण्याच्या (Aundh Police Station) हद्दीमध्ये 10 सप्टेंबर रोजी दोन मुलांच्या इन्स्टाग्राम
अकाऊंटवरुन (Instagram Account) आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याचे समोर आले होते.
त्या मुलांकडे चौकशी केली जता असताना त्या कमेंटला दुसऱ्या गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आली होती.
त्यामुळे रात्री साडेनऊच्या सुमारास तणाव निर्माण झाला होता. जमलेल्या लोकांनी दुचाकी आणि चार चाकी वाहने पेटवून दिली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती. या घटनेत दहा जण जखमी झाले होते.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
सध्या सोशल मीडियावरील पोस्टवरुन अनेक वाद निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत.
त्यामुळे आपल्या कोणत्याही पोस्टमुळे वाद निर्माण होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी,
असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा