‘पुण्यात आफ्टरनुन लाईफ सुरू करावी लागेल’ या वक्तव्यावरून आदित्य ठाकरेंची ‘सारवासारव’, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी नाईट लाईफच्या मुद्द्यावर बोलताना पुण्यातील नाईट लाईफच्या प्रश्नावरून पुणेकरांना कोपरखळी मारली होती. पुण्यात नाईट नव्हे तर आफ्टरनुन लाईफ सुरू करावी लागेल असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं. परंतु यावर त्यांनी आता सारवासारव केली आहे. पुणेकर माझं वक्तव्य विनोदानं घेतील आणि त्याबाबत तेही विनोद करतात” अशा शब्दात त्यांनी सारवासारव केली आहे.

आदित्य ठाकरे मंगळवारी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “प्लास्टिक वापर बंदीबाबत पुणे चांगली भूमिका बजावत आहे. इकोफ्रेंडली वातावरणासाठी पुणे चांगली दिशा दाखवू शकते. पुण्यात ज्याप्रकारे कापडी पिशव्यांना, बांबूच्या वस्तूंचा वापर केला जातो त्या गोष्टी राज्यात किंबहुना देशातही सगळीकडे व्हायला हव्यात. पुण्याला कार्बनमुक्त करण्यासाठी 2030 चं टार्गेट आहे. मात्र पुणे 2025 पर्यंतच हे टार्गेट पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. आघाडीचं सरकार पर्यावरणासाठी सकारात्मक आहे. जगातील बेस्ट प्रॅक्टीस राज्यात आणणार” असंही त्यांनी सांगितलं.

मुंबईत 26 जानेवरीनंतर नाईट लाईफ सुरू झाली आहे. यानंतर पुण्यातही नाईट लाईफ सुरू करणार का असा प्रश्न ठाकरेंना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले होते की, “पुण्यात आधी आफ्टरनुन लाईफ सुरू करावी लागेल” असा टोमणा त्यांनी मारला होता. यानंतर सोशल मीडियावरून पुणेकरांनी ठाकरेंच्या वाक्याचा समाचार घेतला होता. यानंतर त्यांनी आता त्या वक्तव्यावरून सारवासारव केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा