रेल्वे दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी होणार – मुख्यमंत्री अमरिंदर सिंग
रेल्वे अपघातानंतर नागरिकांकडून चांगलाच संताप व्यक्त कला जात आहे. इतकेच नाही तर घटनास्थळी जोरदार घोषणाबाजी सुरु होती. सुरक्षारक्षकांच्या फौजफाट्यात घटनास्थळी दाखल झालेल्या मुख्यमंत्र्यांना रेल्वे रुळापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आपली भेट आवरावी लागली. दीड मिनिटातच त्यांनी तेथून पाय काढला.
चार वर्ष सत्तेत आहात मग राममंदीर का नाही झाले – राष्ट्रवादी नेते
या रेल्वे अपघाताबाबत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, “एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही. न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. अहवाल आल्यानंतरच या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण हे स्पष्ट होईल.” “तसंच नवज्योतसिंह सिद्धू यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढू नका. त्यांनाही अपघाताचं दु:ख आहे,” असंही मुख्यमंत्री अमरिंदर सिंह म्हणाले.