धर्म हा समाजाचा विसर पडू न देणारा व्यवहार : डॉ. भागवत

मुंबई : पोलीसनामा

धर्म हा समाजाचा विसर पडू न देणारा व्यवहार आहे. सगळ्या जगाकडे बंधुभावाने पाहणे, त्यांच्या साठी झटणे महत्वाचे आहे. आपण जे करतोय ते समाजाला पुढे नेण्यासाठी करतोय हा भाव त्यामागे असला पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. आरएसएसच्या मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विशेष म्हणजे याच कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा देखील उपस्थित होते.

[amazon_link asins=’8179925919,B01M2Y9QZE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1534b74c-a826-11e8-af3c-f7baa18928ff’]

आरएसएसशी संलग्न असलेल्या नाना पालकर स्मृती समितीला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना डॉ, भागवत म्हणाले, समाजकार्याची केवळ चर्चा केली जाते. पण या कार्याच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकण्यासाठी नाना पालकर हे आजही प्रेरणादायी आहेत. आज आपल्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. पण जेव्हा ही साधने नव्हती तेव्हा त्यांनी कशाचीही वाट न पाहता, आपल्याला हे कार्य जमेल की नाही, अशा प्रश्नात न अडकता समाजातील एका घटकाला आपली गरज आहे या जाणीवेने ते कार्य करत राहिले. प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार समाजकार्यात सहभागी होऊ शकतो, असे ते म्हणाले.
लंडनमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरएसएसवर जोरदार टीका केली असतानाच हा कार्यक्रम मुंबईत झाला. यावर कोणतीही प्रतिक्रिया डॉ. भागवत यांच्याकडून आली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारताचा आत्माच बदलायचा आहे. अन्य कुठल्याही संघटनांनी भारतातल्या संस्थांवर ताबा मिळवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही असे राहुल म्हणाले होते. राहुल गांधी यांनी अनेक अरब देशांनी दहशतवादी म्हणून जाहीर केलेल्या मुस्लीम ब्रदरहूड या संघटनेशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना केली होती.
यापुर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यावेळी काँग्रेससह सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.