Pune : लग्नाला उपस्थित असणाऱ्या 50 लोकांची ‘RTPCR’ चाचणी बंधनकारक, जाणून घ्या नियमावली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य शासनाने कडक निर्बंध लावण्याचा निर्णय कालच घेतला आहे. यामध्ये लग्न समारंभासाठी केवळ ५० लोकांची अट घातली आहे. याबाबत आता पुण्यात नवे नियम लागू केले आहे. यामध्ये आता लग्न समारंभात असणाऱ्या सर्व लोंकाची आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. ही जर चाचणी केली नाही तर एका व्यक्तीला १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. या नियमांचे जिल्ह्यातील नागरिकांनी कडक अंमलबजावणी केली पाहिजे, असे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी म्हटले आहे.

तसेच, लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमा निमित्त होणारी गर्दी आणि मास्क न वापरणे, सुरक्षित सामाजिक अंतर न राखणे यामुळेच ही परिस्थिती ओढावली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशामध्ये कार्यालय मालकाकडून नियम व अटीचे पालन करणार असल्याचे हमीपत्र घ्यावे. ५० व्यक्तीची उपस्थिती ही संख्या आचारी, मदतनीस, वाढपे, वाजंत्री, भटजी, फोटोग्राफर व्हिडीओ चालक, सुत्रासचालक यांच्यासह गृहीत धरावी, तर मंगल कार्यालय व्यवस्थापक / मालक यांनी लग्न समारंभाचे प्रवेशव्दारावर ऑक्सीमीटर, इन्फ्रा थर्मामीटर (थर्मल स्कॅनिंग गन) चा वापर करावा. तसेच, प्रवेशव्दाराजवळ उपस्थितांचे नाव, मोबाईल क्रमाक व स्वाक्षरी घ्याव्यात .ऐवढेच नाही तर लग्न समारंभ व इतर कार्यक्रम झाल्यानंतर चित्रीकरणाची सीडी ५ दिवसात पोलीस ठाण्यात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणा-यावर थेट गुन्हे दाखल करा आणि मंगल कार्यालयांचे लायसन्स रद्द करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिले आहेत.

पुणे जिल्ह्यातील नवे नियम –

>  लग्न समारंभासाठी सर्वच हजर राहणाऱ्या ५० जणांची नावे पोलीस ठाण्यात सादर करावीत. तर कार्यालय मालकाकडून नियम व अटीचे पालन करणार असल्याचे हमीपत्र घ्यावे.

>  लग्न समारंभास उपस्थित १०० टक्के लोकांची RTPCR बंधनकारक

>  लग्न समारंभाचे ठिकाणी अधिकाधिक ५० व्यक्ती उपस्थित राहतील व त्यांच्यामध्ये सोशल डिस्टंसिंग ६ फुट राखणे बंधनकारक राहील. लग्नसमारंभाचे ठिकाणी बसण्यासाठी व जेवण करताना सामाजिक अंतर राहील अशा पध्दतीने खुणा (मार्किग) कराव्यात. जेवण करताना मास्क काढल्यानंतर एकमेकांशी गप्पा मारण्यावर निबंध ठेवावेत.

>  उपस्थित सर्व नागरिक, वाढपे, आचारी, वाजंत्री, भटजी व वन्हाडी मंडळी यांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील.

>  लग्न समारंभाच्या ठिकाणी गुटखा, पान, तंबाखू खाऊन धुंकणे व असेही थुकणेस व मद्यपान करण्यास सक्त मनाई राहील. आणि त्याचे उल्लंघन केल्यास सदरील व्यक्ती दंडनिय कारवाईस पात्र राहील.

>  लग्नसमारंभासाठी विनावातानुकूलित मंगल कार्यालय / हॉल / खुले लॉन / सभागृह वापरणेत यावी. कोणत्याही परिस्थीतीत वातानुकूलित सेवेचा (AC) चा वापर करणेत येऊ नये.

>  मंगल कार्यालय व्यवस्थापक / मालक यांनी लग्न समारंभाचे प्रवेशव्दारावर ऑक्सीमीटर, इन्फ्रा थर्मामीटर (थर्मल स्कॅनिंग गन) चा वापर करावा. प्रवेशव्दाराजवळ उपस्थितांचे नाव, मोबाईल क्र व स्वाक्षरी घ्यावी

>  लग्न समारंभाची जागा, वारंवार हाताळले जाणारे भाग, खुच्च्या, लग्नाचा संपूर्ण हॉल, किचन, जेवणाचे ठिकाण, स्वच्छतागृह इत्यादी ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करुन वारंवार निजतुकीकरण करावे. तसेच स्वच्छतागृहात हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था करावी.

> सोशल डिस्टन्सचा वापर व अन्य नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी एक किवा दोन प्रतिनिधी नेमावेत.

>  लग्न समारंभात कोरोना विषाणूचा प्राद्र्भाव रोखण्यासाठी व सर्व नियम व अटी पालन करण्याबाबत

जनजागृती करावी.

> लग्नसोहळयाचा सर्व विधीची पाहणी करण्यासाठी पोलीस पाटील, ग्रामसेवक, कामगार तलाठी व पोलीस
यांचे भरारी पथक कार्यरत करावे. या ठिकाणी नियमांचे उलंघन झाल्यास गुन्हे दाखल करावेत.