‘तुम्ही मोरासोबत फोटो काढा किंवा घोड्यावर बसा…देशाची परिस्थिती सध्या बिकट, हे खरे’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकार कोरोनाचा संसर्ग, चीनशी असलेला संघर्ष आणि देशाची अर्थव्यवस्था या सगळ्या आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. तुम्ही मोराबरोबर फोटो काढा, घोड्यावर बसा किंवा देवाची करणी म्हणा… देशाची परिस्थिती बिकट आहे हेच वास्तव आहे,’ अशी जोरदार टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून मोदी सरकारवर करण्यात आली आहे. त्यांनी हि टीका फेसबुक पोस्ट द्वारे केली आहे.

केंद्र सरकार, कोरोना ,चीन आणि देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरले आहे. हे अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारने सहा महिने संसदेचे कामकाज बंद ठेवले. कोणत्याही देशाने त्यांच्या संसदेचे कामकाज बंद ठेवले नव्हते.रशियात बंद होते, पण तिथे हुकमाशाहीच आहे. मात्र, भारतात ते बंद का ठेवले गेले? कारण, सरकारच्या अपयशांवर संसदेत चर्चा होऊ नये, हीच त्यामागची प्रमुख भूमिका होती,’ असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून करण्यात आला आहे. तुम्ही मोराबरोबर फोटो काढा, घोड्यावर बसा किंवा देवाची करणी म्हणा. तुम्हाला सध्याची स्थिती सावरता आलेली नाही.

सरकार म्हणून लोकांना ज्या अपेक्षा होत्या, त्या तुम्ही पूर्ण करू शकलेला नाहीत,’तुम्ही त्यामध्ये अपयशी ठरला आहेत असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून मोदी सरकारला लागवण्यात आला आहे. ‘जगातील कोणत्याच देशाने कोरोनाला देवाची करणी म्हटलेले नाही. केवळ एकमेव आपल्याच सरकारकडून कोरोनाला देवाची करणी म्हणून संबोधण्यात आले आहे. सहा महिन्यापेक्षाही जास्त काळासाठी संसदेचे कामकाज बंद ठेवता येणार नाही, अशी तरतूद संविधानात केलेली आहे. त्यामुळे ६ महिने संपण्याअगोदर एकदा संसेदेच कामकाज सुरु केलं. आता ते कामकाज पुन्हा कधी सुरु होईल याची गॅरंटी नाही, अशी भीती पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.