मुंबई : मेट्रो कारशेडवरून शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांनी थेट शिवसेनेवर हल्लाबोल केला. त्यानंतर आता मुंबईतल्या विक्रोळी भागात एका कार्यक्रमासाठी आलेल्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील शिवसेना हा देशात अजिंक्य असा पक्ष आहे म्हणूनच आम्ही १०५ आमदार घरी बसवले असं म्हणत भाजपाला टोला लगावला आहे.त्यामुळे महाराष्ट्रातली शिवसेना देशात अजिंक्य आहे, म्हणूनच १०५ आमदार आम्ही घरी बसवले. यावेळी त्यांचे १०५ आहेत पुढच्या विधानसभेला शिवसेनेचे १०५ आमदार असतील” असाही विश्वास व्यक्त करत काहीही करा मेट्रोची कारशेड कांजूरलाच होणार असंही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला जनमताचा कौल मिळाला होता. सत्ता स्थापनेवेळी मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार की भाजपाचा यावरुन दोन्ही पक्षांमध्ये उभी फूट पडली. एकमेकांशी २५ वर्षांहून अधिक काळ युती करणारे हे दोन पक्ष वेगळे झाले. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. या सगळ्या घडामोडींचे आणि राजकीय नाट्याचे दोन महत्त्वाचे शिल्पकार होते एक होते संजय राऊत आणि दुसरे होते शरद पवार. संजय राऊत हे सातत्याने मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे सांगत होते. त्यांनी त्यांचा शब्दही खरा करुन दाखवला.
भाजपा हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र तीन पक्षांच्या युतीमुळे भाजपाला विरोधात बसावं लागलं. आणि हेच अपयश भाजप पचवू शकलं नाही. त्यामुळे अगदी सत्ता स्थपनेच्या पहिल्या दिवसापासून शिवसेना आणि भाजप मध्ये जुंपली आहे. दोघांमधील वाद नेहमीच पाहायला मिळतात. राज्यातील कोणताही प्रश्नावरून भाजप शिवसेनेला टार्गेट करतेच असेच चित्र आता पर्यंत पाहायला मिळाले आहे. त्याला शिवसेनेनेही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.
मेट्रो कारशेडवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे मेट्रोची कारशेड आणि १०५ आमदारांच्या मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. त्यांनी कांजूरलाच मेट्रोचे कारशेड होणार असल्याचं निर्धार बोलून दाखवला. एवढेच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे १०५ आमदार असतील असेही बोलूत दाखवले आहे.