देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळेच युती तुटली, शहांच्या ‘त्या’ विधानावरून विनायक राऊतांचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. ते भाजप खासदार नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग येथे असलेल्या ड्रीम प्रोजेक्ट लाईफटाईम या मेडिकल कॉलेजच्या उदघाटनला आले होते. त्यावेळी शहा यांच्या हस्ते उदघाटन झाले. तेव्हा त्यावेळी अमित शहा यांनी शिवसेनेने युती तोडल्यावरून टीका केली होती. त्यावरून आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी त्या टीकेवर प्रत्त्युत्तर दिले आहे. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

विनायक राऊत म्हणाले, गृहमंत्री अमित शहा हट्टवादीपणामुळे भाजपापासून दूर झाले आहेत, ते खोटारडे आणि विश्वासघातकी आहेत. शहा यांच्या या अशा स्वभावामुळेच १७ पेक्षा जास्त पक्ष एनडीएमधून बाहेर पडले आहेत. म्हणून त्यामुळे नेमकं विश्वासघातकी कोण? हे आता दिसुन येते. तसेच युतीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळे युती तुटल्याने केंद्रातील नेत्यांनी मान्य केले आहे. असा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

काय म्हणाले होते शहा ?
मेडिकल कॉलेजच्या उदघाटनावेळी शहा यांनी शिवसेनेवर टीका करत म्हणाले, आपण जे काही राजकारण करतो ते छाती ठोकून करतो. शिवसेनेनला आपण कोणतेही वचन दिले नव्हते. उलट त्यांनी फसवले. भाजप साखर कारखानदारानां कोण धमकावत असेल तर घाबरत नाही. ज्या वेळेस मुख्यमंत्री फडणवीस होते, त्यांनी जर तशा स्वरूपाचे वागले असते तर शिवसेना राहिली नसती.