मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नेहमीच लाईमलाईटमध्ये राहणारी जोडी अभिनेत्री दिशा पाटनी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांचे रस्ते वेगळे झाले आहेत. टायगर आणि दिशा यांनी कधीच आपले नाते उघडपणे जाहीरही केले नव्हते आणि कबूलही केले नव्हते. पिंक व्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ यांचं ब्रेकअप झालं आहे. सध्या ते फक्त चांगले मित्र आहेत. दिशा आणि टायगरने आपले नाते कधीच जाहीर केले नाही. परंतु त्यांच्यादोघांबद्दल मात्र नेहमीच बोलले जात होते.
…म्हणून टायगर-दिशाचं ऑफिशियल ब्रेकअप
टायगर दिशाच्या ब्रेकअपचे कारण शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आहेत असेही बोलले जात होते. कारण काही दिवसांपूर्वी दोघेही डिनरनंतर हॉटेलबाहेर स्पॉट झाले होते. परंतु दोघांच्या ब्रेकअपचे खरे कारण नेमके काय आहे हे आता स्पष्ट झाले आहे. टायगर आणि दिशाच्या जवळच्या सूत्रांनी याबाबत पिंक व्हिलाला माहिती दिली आहे. त्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच दिशा आणि टायगरच्या नात्यात दुरावा आला होता. यानंतर या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी हे नाते एकमेकांच्या संमतीने संपवण्याचं ठरवून आता ऑफिशिअल ब्रेकअप केलं आहे.
सूत्रांचं म्हणणं आहे की…
ब्रेकअप झाल्यानंतर आता दोघांमध्ये कोणतंही रोमँटीक नातं राहिलेलं नाही. दोघेही आता चांगले मित्र आहेत. केवळ त्यांचं फ्रेंड सर्कल सारखं असल्याने ते बऱ्याचदा एकत्र दिसतात. सूत्रांचंही असं म्हणणं आहे की, दिशा आणि टायगर आपल्या नात्याबद्दल कधीच काही बोलले नाहीत, जर ते नात्यावर काही बोलत नसतील तर आता ब्रेकअपवर काय बोलणार !
हेच आहे ब्रेअकपचे खरे कारण
काही दिवसांपूर्वी दिशा पाटनी आदित्य ठाकरें सोबत स्पॉट झाली होती. तेव्हापासून टायगर-दिशाच्या ब्रेकअपच्या चर्चेला उधाण आले होते. परंतु या ब्रेकअपचे कारण हे आदित्य ठाकरे नाहीत, तर त्यांच्यातील परस्पर वाद आहे हे आता समोर आले आहे.
सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते
धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग
झोपेत आलेल्या हार्ट अॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान
गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’