Uddhav Thackeray On Eknath Shinde Group | कमळाबाईला पालखीत हिंडवण्यासाठी शिवसेना नाही, ठाकरेंनी शिंदे गटाला सुनावले

जळगाव : Uddhav Thackeray On Eknath Shinde Group | २५ वर्षे शिवसेनेची भाजपा झाली नाही. मग, शिवसेनेची काँग्रेस कदापीही होणार नाही. शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत घेऊन हिंडवण्यासाठी केलेली नाही, असा जोरदार टोला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला लगावला. ते जळगाव येथे आयोजित सभेत बोलत होते. (Uddhav Thackeray On Eknath Shinde Group)

या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपासह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे म्हणाले, माझा जीव देश आणि जनतेसाठी जळत आहे. देशाला जागे करण्याचे काम वंशपरंपरागत माझ्याकडे आले आहे.

ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी मुंबईत ‘इंडिया’ची बैठक पार पडली. यांचे अध्यक्षपद शिवसेनेकडे होते. बैठक पार पडल्यानंतर गद्दारांनी शिवसेनाप्रमुखांच्या फोटोसह बॅनर लावले. त्यावर ‘मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही’ असे लिहिले होते.

२५ वर्षे शिवसेनेची भाजपा झाली नाही. मग, शिवसेनेची काँग्रेस कदापीही होणार नाही.
शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत घेऊन हिंडवण्यासाठी केली नाही, असे ठाकरे म्हणाले.

‘इंडिया’ नावाची यांना खाज सुटलीय

भाजपावर टीका करताना ठाकरे म्हणाले, वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना स्टेज थोडे हालत होते.
त्या स्टेज सारखेच केंद्र सरकार डगमगत आहे. कधी पडेल कळत नाही. एवढे घाबरलेत की, आधी वाटायचे समोर कुणी
आव्हान नाही. मात्र, सगळे देशप्रेमी पक्ष एकत्र आल्याने ‘इंडिया’ नावाची यांना खाज सुटली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Sada Sarvankar | शिंदे गटातील सदा सरवणकर यांचा ठाकरे आणि राऊतांवर गंभीर आरोप; म्हणाले – ‘मनोहर जोशींच्या घरावर पेट्रोल टाकून…’