[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6ed76923-bd59-11e8-b981-2b641ce501e8′]
पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गुन्हेगाराला जीवे मारण्याचा प्रयत्न
दरम्यान, तिच्या ओळखीच्या रेणुका नरूणा व मंगल हेळकर यांनी तिच्याशी गोड बोलून आणि विश्वास संपादन करून स्वत:ची आर्थिक अडचण पुढे केली. तेव्हा सहकार्य करण्याच्या हेतूने नागूबाईने त्यांना एक लाखांची रक्कम हातउसने दिली होती. मात्र, मुदत टळली तरी हातउसने घेतलेली रक्कम परत मिळत नसल्याने नागूबाईने तगादा लावला. तेव्हा चिडलेल्या रेणुका व मंगला यांनी तिच्याशी भांडण काढले. विजापूर रस्त्यावरील सैफुल भाजीमंडईत नागूबाई दररोज भाजी विकण्यासाठी यायची. त्याठिकाणी रेणुका व मंगला यांनी तिच्यावर चोरीचा आळ घेतला. मंगला हिचा मुलगा जगन्नाथ यानेही तिला मारहाण केली. तर रेणुका हिने नागूबाई हिला पुन्हा भाजी मंडईत दिसली तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. चोरीचा आळ घेतला गेल्याने नागूबाईला प्रचंड मानसिक धक्का बसला. याच मानसिक धक्क्यातून तिने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.