‘राज्यात अघोषित आणीबाणी, सरकार अहंकाराने वागतंय’

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात अघोषित (Undeclared) आणीबाणी (Emergency) लागू झाली आहे असं वातावरण आहे. सरकारच्या विरोधात बोललं की तुरुंगात (Jail) टाकलं जात आहे. कुठल्या तरी प्रकरणात अडकवलं जात आहे. अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) आणि कंगना (Kangna) यांच्या प्रकरणात खरंतर ठाकरे सरकारला (Thackeray Government) चपराक बसली आहे. तरीही महाराष्ट्रात कुणीही काहीही सरकारच्या विरोधात बोललं की त्याला कुठल्या तरी केसमध्ये अडकवायचं असे प्रकार सुरु आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस (Decendra Fadanvis) यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.

ADV

तुमच्यावर केस दाखल केली जाईल किंवा जेलमध्ये टाकलं जाईल असं धमकावले जात आहे. खरंतर अर्णब गोस्वामी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेला नकार आणि कंगना राणौत प्रकरणात हायकोर्टाने दिलेला निकाल हे दोन्ही निकाल सरकारला चपराक देणारे आहेत. अर्णब गोस्वामी आणि कंगना यांच्या सगळ्या विचारांशी आम्ही सहमत नाही. मात्र ज्या प्रकारे कारवाई झाली आणि जे कोर्टाने या दोन्ही प्रकरणात जे ताशेरे ओढले आहेत. त्यानंतर या सरकारला तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. तरीही यातून सुधारण्याच्या ऐवजी सत्तेचा अहंकार हे सरकार दाखवत आहे. सत्तेचा अहंकारातून सरकार कशाप्रकारे वागतं ते आत्ताचं सरकार तेच दाखवून देत आहे. असं अहंकारी सरकार जगाच्या पाठीवर कधीही कुठेच चालत नसल्याचे फडणवीस म्हणाले.

योग्य ते उत्तर या अहंकाराला आम्ही देऊ. कोणताही संघर्ष करण्यासाठी आम्ही मागेपुढे पाहणार नाही. जनतेच्या प्रश्नांवर आणि जनतेसाठी आम्ही सरकारला उत्तर देऊ. हे सरकार अहंकारी आहे या सरकारचे निर्णय हे तुघलकी आहे. अधिवेशनात जो काही वेळ आम्हाला मिळेल त्यात आम्ही सरकारला जाब विचारणारच असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.