मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – या देशात राहणारे सर्व 130 कोटी नागरिक हे हिंदू आहेत असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. तेलंगणातल्या हैदराबाद येथे संघाच्या शिबिरात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. त्यावरुन आता वाद सुरु झालाय. संघाला सर्व देशच हिंदू करायचा असून त्यांचा तोच अजेंडा आहे अशी टीका त्यांच्यावर करण्यात येत आहे.
Union Min Ramdas Athawale on Mohan Bhagwat's remark '130 cr population of India as Hindu society': Not right to say all are Hindus.There was a time when everyone was Buddhist in our country. When Hinduism came, we became a Hindu nation. If he means everyone is ours then it's good pic.twitter.com/bXWIsHhDbU
— ANI (@ANI) December 26, 2019
विरोधकांकडून सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका होत असताना या वादात आरपीआयचे नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. आठवले यांनी मोहन भागवत यांचा दावा खोडून काढला आहे. ते म्हणाले, सर्व लोक हिंदूच आहेत असं म्हणणं योग्य होणार नाही. एकेकाळी हा देश बौद्ध धर्माला मानणारा होता. हिंदू धर्माची लाट आल्यानंतर देश हिंदू बहुल झाला. पण सगळेच आपले आहेत असं जर भागवत म्हणत असतील तर ते चांगलं आहे असेही आठवले म्हणले.
काय म्हणाले होते भागवत ?
देशात हिंदुत्वावरून राजकारण तापले असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एका हिंदुत्वाचा राग आवळला आहे. हैदराबाद इथ संघाचं तीन दिवसांचं शिबीर पार पडलं. विजय संकल्प शिबीर असे नाव या शिबिराला देण्यात आले होते. यावेळी बोलताना भागवत म्हणाले, या देशात राहणारे सर्व 130 कोटी लोक हे हिंदुच आहेत. हिंदू याचा अर्थ अतिशय व्यापक आहे. तो संकुचित नाही. जो व्यक्ती कुठल्याही पूजा पद्धतीचा अंगिकार करत असो, पण तो या देशाला मातृभूमी मानतो, जन, जल, जंगल, जमीन आणि जनावरांना श्रद्धास्थानी मानतो ते सगळे हिंदुच आहेत असे आम्ही मानतो.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- आरोग्यासाठी लाभदायक आक्रोड, खरेदी करताना ‘या’ ४ गोष्टी लक्षात ठेवा
- ‘ही’ आहेत मासिक पाळीच्या अनियमिततेची ५ कारणे !
- त्वचेचे सौंदर्य राखतील ‘ही’ ४ व्हिटॅमिन्स, जाणून घ्या फायदे
- PCOS वर नियंत्रण असे मिळवा, ‘ही’ आहेत १२ लक्षणे
- चमकदार त्वचेसाठी बेसन वापरून बनवा ‘हे’ ५ फेसपॅक !