‘देशाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचलेली कदापि सहन करणार नाही’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   दुंडिगल येथील एअर फोर्स अ‍ॅकॅडमीच्या दीक्षांत संचलनाच्या कार्यक्रमावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की ,”भारत कमकुवत देश नसून कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देऊ शकतो, हे चीन सीमेवरील संघर्षाच्या परिस्थितीच्या हाताळणीतून भारताने दाखवून दिलं आहे. भारताला शांततेच्या मार्गाने तोडगा हवा आहे. मात्र, देशाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचलेली सहन केली जाणार नाही.” तसंच, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचलेली सहन केली जाणार नाही, असं ही ठणकावून सांगितलं आहे.

“भारताला संघर्ष नको तर शांतता हवी आहे. चीनसोबतचे वाद मिटविण्यासाठी राजकीय आणि लष्कराच्या स्तरावर अनेकदा चर्चा झाल्या” असं म्हटलं आहे. तसेच दहशतवादाशी केवळ देशातच लढले जात नसून; सीमेपलीकडेही जाऊन संपवले जात आहे. बालाकोटमध्ये केलेल्या एअरस्ट्राईकमुळे जगाला भारताचे सामर्थ्य, भारताचे हेतू आणि दहशतवादाविरुद्धची ठाम भूमिका दिसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. कोविड १९ च्या संकटादरम्यान चीनचा पवित्रा त्यांचे हेतू दर्शवत होता, असं संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे.

राजनाथ सिंह यांनी यावेळी पाकिस्तानवरही निशाणा साधला आहे. “भारताकडून चार वेळा युद्ध हरल्यानंतरही पाकिस्तानच्या सीमेवरील कुरापती सुरूच आहेत. दहशतवादाच्या रूपाने पाकिस्तानने ‘प्रॉक्सी वॉर’ सुरू केले आहे. सशस्त्र दले आणि पोलीस दहशतवादाशी प्रभावीपणे लढा देत आहेत” असं म्हटलं आहे. यासोबतच ‘देशासमोर केवळ सीमाभागातीलच आव्हाने उभी नसून अवकाश आणि सायबर क्षेत्रातही ती आहेत. त्यासाठी देशाला सुसज्ज राहावे लागणार असल्याचं म्हटलं आहे. असं एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

संभाव्य धोक्यांची कल्पना ही सरकारला दिली आहे… राहुल गांधी यांचं ट्विट

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनासह विविध मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “मोदी सरकार झोपेत असताना चीनच्या कुरापती सुरू झाल्या आहेत. मी आजपर्यंत अनेकदा चीनकडून येणाऱ्या संभाव्य धोक्यांची कल्पना ही सरकारला दिली आहे. मोदी सरकार झोपेत असताना चीनच्या कुरापती सुरू झाल्या आहेत. चीनने जी नवी खेळी केली आहे ती भारतासाठी धोकादायक ठरू शकते. चीनने काराकोरमला कमी वेळात पोहचण्यासाठी एक नवा रस्ता तयार करण्यास सुरुवात केली आहे. हा रस्ता भारताची डोकेदुखी ठरू शकतो. देशातील कोट्यवधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.”