‘रावसाहेब दानवेंना घरात घुसून मारायला हवं’ : बच्चू कडू

ADV

पोलीसनामा ऑनलाइन – “शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात आहे “, असा अजब दावा भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर दानवेंवर चहूबाजूंनी टीका होत आहे. याबाबत प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्यावर टीकाटिपणी केली. “रावसाहेब दानवे यांना आता घरात घुसून मारावं लागेल,” असा संताप प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले. “मागच्या वेळीस रावसाहेब दानवे यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं. तेव्हा आम्ही त्यांच्या घराला घेराव घातला होता. पण आता असं वाटतंय की आम्हाला त्यांना घरात घुसून मारावं लागेल.” दरम्यान, प्रहार संघटनेचं आज औरंगाबादमध्ये शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीवर चढून रावसाहेब दानवे यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. तर दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर रोष व्यक्त केला.

ADV

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही फटकारलं
“शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असेल तर संरक्षणमंत्र्यांनी तातडीने पाकिस्तान आणि चीनवर सर्जिकल स्ट्राइक करायला हवा. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनीही याचा गांभीर्याने विचार करायला हवा.”