Weather Alert ! अरबी सुमद्रात ‘तौंते’ चक्रीवादळ, राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दक्षिण-पूर्व समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. पुढील 24 तासांमध्ये कमी दाबाच्या पट्ट्याचं वादळामध्ये रुपांतर होणारदक्षिण-पूर्व समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. पुढील 24 तासांमध्ये कमी दाबाच्या पट्ट्याचं वादळामध्ये रुपांतर होणार आहे. या वादळाचं नाव तौंते असं आहे. 15, 16 आणि 17 या तारखेला या वादळाचा प्रभाव दिसेल. कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय 16 आणि 17 तारखेला मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये या वादळाचा प्रभाव दिसेल अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या वैज्ञानिक शुभांगी भुत्ये यांनी दिली आहे.
A depression has formed over Lakshadweep area. To intensify further into a cyclone during next 24 hours and move towards Gujarat coast. For more information kindly visit www. https://t.co/w8q0AaMm0I or https://t.co/KLRdEFp9rJ pic.twitter.com/LHxf0WoQLy
— India Meteorological Department (@Indiametdept) May 14, 2021
तौंते हे चक्रीवादळ शनिवारी सकाळपर्यंत त्याच भागात असेल. त्यानंतर रविवारी (दि.16) चक्रीवादळामध्ये तीव्रता येईल. परिणामी दक्षिण भारतात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. येत्या चार दिवसांत कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच या राज्यातील जनतेला रेड अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळाची वेगाने होणारी वाढ लक्षात घेता आयएमडीने महाराष्ट्र व गुजरातच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
अरबी समुद्रात १६ मे ला तयार होणा-या चक्रीवादळा नुसार आयएमडीने आज, येणा-या 4 दिवसासाठी तीव्र हवामानाचे इशारे दिले आहेत. कोकणात व मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात १४ ते १५मे पासून मोठा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे;शनि/रविवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.रविवारी मुंबईतपण pic.twitter.com/DcTAwBiTwz
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 14, 2021
कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी
जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. 15 ते 17 मे दरम्यान किनारपट्टी भागातील लोकांना सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. आयएमडीने रविवारी आणि सोमवारी रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड येथे सोमवारी मुसळधार पाऊस पडेल.
या जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’
हवामान विभागाने सिंधुदूर्ग जिल्ह्याला रविवारी आणि सोमवारी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. या कालावधीत येणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.