म्हणून विराटला येतो ‘राग’, अनुष्काने सांगितले ‘कारण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सर्वात जास्त चर्चा कोणत्या कपलची आहे तर ते प्रसिद्ध कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहली. परंतू अनुष्का शर्माचा स्वभाव शांत तर विराट खूपच (रागिष्ट) एग्रेसिव पर्सन म्हणून ओळखला जातात. त्याची ही एग्रेसिव अक्शन क्रिकेटच्या मैदानावर देखील दिसते. यावर अनुष्काला एका मुलाखतीत याच प्रश्नाला उत्तर देताना म्हणाली की विराट सर्वात कुल माणूस आहे.

म्हणून विराटला येतो राग
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत अनुष्का शर्माने सांगितले की, विराट सर्वात जास्त शांत असलेला व्यक्ती आहे, ऑफ द फिल्ड तो अत्यंत रिलॅक्स आहे. हे तुम्ही माझ्या मित्रांना आणि टीमला देखील विचारु शकतात. तो फिल्डवर एग्रेसिव आहे कारण तो त्याबाबत अत्यंत पॅशनेट आहे. परंतू रियल लाइफमध्ये तो अजिबात एग्रेसिव नाही. मी अनेकदा विराटला म्हणते की ‘यू आर सो चिल’.

म्हणून ब्रेक घेतला
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत अनुष्का ने सिनेमातून ब्रेक घेण्याचा आपल्या निर्णयाबाबत चर्चा केली यावेळी तिने सांगितले की, जिरोच्या प्रदर्शनानंतर मी काही महिने ऑफ घेऊ इच्छित आहेत. जेव्हापासून माझे लग्न झाले तेव्हापासून हा एक मोठा बदल झाला आहे. मी लागोपाठ काम करत होते. जोही वेळ मिळेल त्याचे नियोजन करुन करुन मी विराटला भेटत होती. मला वाटले की आता मी भरपूर काम केले आहे.

अनुष्काने सांगितले की, मला २ महिन्याचा ब्रेक हवा होता. मी माझ्या टीमला सांगितले की आता मला काहीही शिकायचे नाही, एक क्रिएटिव व्यक्ती असल्याने तुम्हाला थोडा वेळ मिळणे आवश्यक असते. परंतू तणावात असल्याने तुम्ही स्वताला वेळ देऊ शकत नाही. तुम्हाला सतत विचारले जाते तुम्ही कोणता सिनेमा साइन केला आहे. मुलाखतीत तिने ब्रेक घेतल्याबद्दल बरेच भाष्य केले. परंतू हे स्पष्ट केले नाही की ती कोणत्या प्रोजेक्टमधून कमबॅक करणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त