कंटेनरची रिक्षाला भीषण धडक, ६ ठार, ४ जखमी

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन

भरधाव कंटेनरने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात रिक्षातील सहा जणांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. कंटेनरचा समोरच्या बाजूचा एक टायर फुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग सातवरील येरला शिवारात वर्धा नदीच्या पुलाजवळ हा भीषण अपघात झाला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6bc14da8-c600-11e8-9fd0-b11f80b34c17′]

हैदराबाद मार्गावरील येरला फाट्यालगतच्या वर्धा नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला. या अपघातात नितीन कंगाले (३०) रा. सोनेगाव (रा.), यमुना कंगाले (५५), हरिभाऊ ठमके (५८) रा. येरला, ज्ञानेश्वर रामाजी कुंभरे (५५) रा. सोनेगाव (रा.), श्रावण बापूराव आलाम (६५) रा. गांगापूर, वच्छला श्रावण आलाम (५५) रा. गांगापूर यांचा मृत्यू झाला. तर बंडु मडावी (५५) फुकटा, वच्छला बंडू मडावी (५०) रा. फुकटा, नानाजी पुरके (५०) रा. मानकापूर, जानराव कंगाले (६०) सोनेगाव हे गंभीर जखमी झाले. जखमींना परिसरातील नागरिकांच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांनी आपल्या चमुसह घटनास्थळ गाठून मृतदेह वडणेर रुग्णालयात पाठवले. तसेच जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या रस्त्यावर दुरुस्तीचे काम सुरू असून राष्ट्रीय महामार्ग असूनसुद्धा एकेरी वाहतूक सुरू आहे. तसेच कंटेनरचे टायर फुटल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या अपघाताचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. भीषण अपघातात तब्बल सहाजणांनी प्राण गमावल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7376df9d-c600-11e8-99e7-1d2178e4a336′]

जाहिरात

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2fab91f3-c601-11e8-ae96-7100f0c5eb6a’]