शेतात शेळी आल्याने महिलेला विवस्त्र करुन मारहाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

श्रीगोंदा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. शेतामध्ये शेळी गेल्याच्या किरकोळ कारणावरुन दोन गटातील वादानंतर एका महिलेला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात विनयभंग आणि अॅट्रॉसिटीच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र आरोपी अद्यापही मोकाटच आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4d9805de-c190-11e8-ac10-fb5bff1175eb’]

श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव गावात १२ सप्टेंबरला हा प्रकार घडला होता. गावातील रहिवाशी वाघस्कर कुटुंबीय आणि पारधी कुटुंबामध्ये शेतात शेळी गेल्याच्या कारणावरुन वादावादी झाली आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झालं. या भांडणात पडलेल्या महिलेला वाघस्कर कुटुंबीयांनी विवस्त्र करुन मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाल्याची माहिती अहमदनगर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. पारधी समाजाच्या कुटुंबाला माारहाण करणाऱ्या जयसिंग वाघस्कर, संतोष वाघस्कर, मनोहर वाघस्कर आणि कुटे या चौघांविरोधात विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मारहाण झालेल्या पारधी कुटुंबियांवर मारहाण आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B077B3MXKW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’56b9f950-c190-11e8-bfa0-bd8a1ae65802′]

मात्र पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप पारधी कुटुंबाने केला आहे. घटनेनंतर तीन दिवसांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला.

विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर आरोपींना न्यायालयाने २८ तारखेपर्यंत अंतरिम जामीन मंजुर केला आहे. त्यामुळे आरोपींना अटक न केल्यास १ ऑक्टोबरला आंदोलन करण्याचा इशारा पारधी कुटुंबियांनी दिला आहे. मात्र आरोपींविरोधात अॅट्रॉसिटी आणि विनयभंगचा गुन्हा दाखल असताना पोलिसांनी आरोपींना अटक का केली नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
[amazon_link asins=’B079Q64PW6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’605da046-c190-11e8-bce0-af4c42972137′]

या सगळ्या प्रकारावर संताप व्यक्त करत शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाचा तपास करून आरोपींना ताब्यात घेणार का असा प्रश्न उपस्थित होतो. पण दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिकांकडून या अमानुष वागणुकीवर संताप व्यक्त केला जात आहे.

शेतात शेळी आल्याने महिलेला विवस्त्र करुन मारहाण