Air India Deal | टाटा सन्सने 18000 कोटीमध्ये एयर इंडियाची डील जिंकली, मंत्रिगटाने अखेर केले मान्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Air India Deal | Dipam सचिवांनुसार मंत्री गटाने Air India Deal च्या निर्गुंतवणूक प्रक्रियेत Tata Sons ने बोली जिंकल्याचे मान्य केले आहे. टाटा समुहाने ऑक्टोबरमध्ये टाटा एयरलाइन्स नावाने एयर इंडियाचे गठण केले होते. यानंतर सरकारने 1953 मध्ये एयरलाइनचे राष्ट्रीयकरण (Nationalisation) केले होते.

18000 कोटीमध्ये जिंकली बोली
Dipam सचिव तुहीन कांत पांडे यांनी म्हटले की, Tata Sons ने एंटरप्राईज व्हॅल्यू 18000 कोटी रुपये लावली होती. या मोठ्या बिडमध्ये दोन बोली लावणार्‍या ग्रुपने भाग घेतला होता. 5 बिडर्सला अयोग्य घोषित केले गेले, कारण त्यांची बोली ठरलेल्या मापदंडासोबत मिळती-जुळती नव्हती.

एकुण किती कर्मचरी
नागरी विमानन मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल यांच्यानुसार एयर इंडियामध्ये 12,085 कर्मचारी आहेत, ज्यामध्ये 8,084 कायम कर्मचारी आहेत आणि 4,001 कर्मचारी करारावर आहेत. याशिवाय एयर इंडिया एक्सप्रेसमध्ये 1434 कर्मचारी आहेत. 1 वर्षापर्यंत जर त्यांच्या कपात झाली तर त्यांना व्हीआरएस द्यावा लागेल.

Talace Pvt ची होईल एयरलाइन
Dipam सचिवाने सांगितले की, टाटा सन्सचे युनिट Talace Pvt Ltd ने 18 हजार कोटी रुपयांत ही बोली जिंकली आहे.
ही डील डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
ही बिड मंजूर करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचे पॅनल बनवले होते.
यामध्ये दोन बिडरमध्ये मोठी स्पर्धा होती.

Web Title :- Air India Deal | air india deal tata group wins air india bid says dipam sec tuhin kant pandey

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे महापालिकेच्या कचरा गाडीला मागून धडकून स्विफ्ट कार चालकाचा मृत्यू

kareena kapoor | करिना कपूर- युवराज सिंगचे ‘एकत्रित’ फोटो साेशल मीडियावर व्हायरल

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानला न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला