‘गेलात तिथं सुखी रहा, काही जणांच्या बाबतीत आमचा निर्णय ठाम’ : शरद पवार

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या पक्षातून बाहेर गेलेले अनेकजण परत येऊ इच्छिकत आहेत. त्याविषयी आम्ही चर्चा करून निर्णय घेतोय, परंतु काही जणांच्या बाबतीत आम्ही पक्का निर्णय घेतला आहे. आता त्यांना पुन्हा घेणं नाही. गेलात तिथं सुखी रहा अशी भूमिका घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिली. तुळजापूर येथे ते पत्रकारांसोबत बोलत होते.

उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारंसोबत बोलताना खडसेंच्या पक्षांतरावरही भाष्य केलं. पवार म्हणाले, “एकनाथ खडसेंनी त्यांच्या पक्षासाठी मोठे कष्ट घेतले आहेत. विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. याची नोंद पक्ष घेत नाही असं त्यांना वाटत असेल. दुसरा पक्ष त्याची नोंद घेतो असंही त्यांना वाटत असेल” असं म्हणत त्यांनी यावर पूर्ण भाष्य करत टाळलं.

यावेळी बोलताना त्यांनी घराबाहेर पडण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली. ते म्हणाले, मुख्यमंत्रीही पाहणी दौऱ्यावर येत आहेत. ते बाहेर पडत नाहीत असं नाही. आम्हीच त्यांना सांगितलं की, एका ठिकाणी बसून नियोजन करा.