खलीज टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे की, अबुधाबी येथे यूएई-भारत कॉनक्लेव दरम्यान नॅशनल अॅडव्हायजर ब्यूरो लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य सल्लागार अब्दुल्ला अलशेही यांनी याचा खुलासा केला आहे. अलशेही कन्सल्टंट कंपनी नॅशनल अॅडव्हायजर ब्यूरो लि.ची संस्थापक आहे. त्यांनी म्हटले की, पाण्याखालील रेल्वेच्या जाळ्याचा फायदा यूएई-भारताशिवाय दुसऱ्या देशांनाही फायदा होईल. प्रवाशांशिवाय इंधन आणि इतर साहित्यांच्या आयात-निर्यातीसाठी याचा वापर केला जाऊ शकतो. सध्या याबाबत फक्त विचार सुरु आहे. मुंबई शहराला पाण्याखालून रेल्वे सेवेने जोडण्याची आमची इच्छा आहे. यामुळे द्विपक्षीय व्यवसायाला चालनाही मिळेल. भारताला तेल निर्यात करता येईल त्याचबरोबर नर्मदा नदीतून अतिरिक्त पाणी आयात केले जाईल, असे ते म्हणाले.
या योजनेवर विविध दृष्टीकोनातून विचार करण्याची गरज आहे. या प्रकल्पासाठी अभ्यास केला जाईल. जर हे वास्तवात आणता आले तर पाण्याखालून सुमारे २००० किमीचे रेल्वे जाळे उभारले जाईल. जगात सध्या अशा पद्धतीचे अनेक प्रकल्प पाइपलाइनमधून कार्यान्वित आहेत. चीन, रशिया, कॅनाडा आणि अमेरिका देश यावर विचार करत आहेत. सध्या भारतात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन धावण्याची वाट नागरिक बघत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यापूर्वी या प्रकल्पाचा भव्यदिव्य असा शुभारंभ केला होता. आता दुबईच्या सहकार्याने भविष्यात समुद्राखालून मुंबई-दुबई रेल्वेमार्गही प्रत्यक्षात येऊ शकतो.