बिहारचे मंत्री माहेश्वर हजारी रिया चक्रवर्तीवर भडकले, म्हणाले – ‘विषकन्या आणि सुपारी किलर’

पाटणा : वृत्तसंस्था – अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर बरेच आरोप होत आहेत. दरम्यान बिहार सरकारचे मंत्री माहेश्वर हजारी यांनी रियाला विषकन्या आणि सुपारी किलर असल्याचे म्हटले आहे.

यापूर्वी मंत्री माहेश्वर हजारी म्हणाले होते की, ‘रिया चक्रवर्तीला एका गँगच्या माध्यमातून कट रचून सुशांत जवळ पाठवले गेले आणि प्रेमाच्या जाळ्यात फसवून एखाद्या फिल्मप्रमाणे विषकन्या काम करते तसेच रियाने येऊन त्याला त्रास दिला आहे.’

हजारी म्हणाले होते, ‘सुशांत जो सर्व गोष्टींमध्ये टॅलेंटेड होता आणि त्याचे कोट्यावधी चाहते होते, ज्या प्रकारे लोकांनी माध्यमांद्वारे आवाज उठवला, ते आभारास पात्र आहेत. जर माध्यमांनी या गोष्टींवर प्रकाश टाकला नसता, तर आम्ही असे मानले असते कि आता न्याय मिळणे कठीण होईल.’

सुशांतचे वडील केके सिंह यांनी दाखल केलेल्या एफआयआरचा उल्लेख करत हजारी म्हणाले होते, ‘जेव्हा त्याच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला आणि सर्व गोष्टी उघडकीस आल्या तेव्हा लोकही चिडले, त्यामुळे ते पुढे आले. तो तरुण असो की बिहार किंवा देशातील सर्व लोकांची हीच मागणी आहे कि न्याय मिळाला पाहिजे.’

मंत्री माहेश्वर हजारी म्हणाले होते की, आपले आमदार नीरज सिंह बबलू त्यांच्यामार्फतच माझी ओळख सुशांतशी झाली होती आणि बोलणेही झाले होते तेव्हा कळले कि अतिशय हुशार मुलगा आहे, हे दुर्दैव आहे की राज्यातील एक तारा आपण गमावला आहे आणि मला वाटते की त्याला न्याय मिळाला पाहिजे.