पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीच्या मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता मोर्चा शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे वळवला आहे. आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी परिसरातील कोरोनाबाधितांच्या संख्येबाबत त्यांनी शंका उपस्थित केली आहे. ’आदित्य ठाकरेचा मतदारसंघ साउथ मुंबईमध्ये येतो.
आदित्य ठाकरेचा मतदारसंघ Gसाऊथ मुंबई मध्ये येतो. अचानक कंटेनमेंट झोनमधून ह्या वरळी भागाला वगळून सांगण्यात येतं की ९ दिवसांपासून एकही नवीन रुग्ण आढळला नाही, हे खरं असेल तर आनंद आहे पण हा भाग फक्त आदित्यचा मतदारसंघ आहे म्हणून बातमी देऊन कोण झाकायचा प्रयत्न करत असेल तर तो अपराध होईल.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 23, 2020
अचानक कंटेनमेंट झोनमधून या वरळी भागाला वगळून सांगण्यात येत आहे की 9 दिवसांपासून एकही नवीन रुग्ण आढळला नाही. हे खरं असेल तर आनंद आहे. पण हा भाग फक्त आदित्यचा मतदारसंघ आहे म्हणून बातमी देऊन कोण झाकायचा प्रयत्न करत असेल तर तो अपराध होईल,’ अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. राणे कुटुंब आणि शिवसेनेत वारंवार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. त्यातच ट्विटरवर सक्रिय असलेले निलेश राणे शिवसेना आणि शिवसेनेचे नेतृत्व यांच्यावर वारंवार शेलक्या शब्दांत टीका करण्यात येते. महाराष्ट्र असाच तुम्ही चालवला तर लवकरच लोक चपलेने आभार मानतील तुमचे. या सरकारमध्ये ठेकेदार कचरा विकून श्रीमंत होत आहेत. त्यांना कोणाची भीती वाटत नाही. कारण त्यांना माहीत आहे कार्यवाही झाली तरी पैसे देऊन सुटू शकतो. ठाकरे नाही ठेकेदार सरकार आले आहे,’ अशी टीका नुकतीच निलेश राणे यांनी केली होती.