भाजप नेते प्रसाद लाड यांचा खोचक सवाल, म्हणाले – ‘बार, रेस्टॉरंट्स उघडण्याची घाई याचसाठी केली होती का?’
पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना यांना दरमहा 100 कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. यानंतर भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी बार, रेस्टॉरंट्स यासाठी उघडण्याची घाई केली होती का? असा खोचक सवाल करत गृहमंत्री देशमुख आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
अरे वा रे देशमुख साहेब काय भारी खेळ चालवला हो!! महिन्याला १०० कोटी?
अधिकाऱ्यांना शासकीय बंगल्यावर बोलवून आकडा ठरवायचे ?
बार, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट्स उघडण्याची घाई याच साठी केली होती का हो?
यांचे पुढील बाप कोण यांची देखील माहिती दयावी!@TV9Marathi @abpmajhatv@BJP4Maharashtra— Prasad Lad (@PrasadLadInd) March 20, 2021
प्रसाद लाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून गृहमंत्री देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. अरे वा रे देशमुख साहेब काय भारी खेळ चालवला हो, महिन्याला 100 कोटी?,अधिकाऱ्यांना शासकीय बंगल्यावर बोलवून आकडा ठरवायचे? बार, रेस्टॉरंट्स उघडण्याची घाई याचसाठी केली होती का हो?, यांचे पुढील बाप कोण यांची देखील माहिती दयावी, असे म्हणत प्रसाद लाड यांनी या प्रकरणी जोरदार टीका केली. दरम्यान अचानक पदभार काढून घेण्यात आल्यामुळे नाराज झालेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग पदभार न घेताच रजेवर गेले आहेत. तसेच ते स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या पवित्र्यात असल्याचे समजते.