14 नोव्हेंबर नाही तर ‘या’ दिवशी साजरा करण्यात यावा बालदिन, भाजप खासदाराची PM मोदींकडे पत्राद्वारे मागणी

नवी दिल्ली – वृत्त संस्था – माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी साजरा होणाऱ्या बालदिनाची तारीख बदलण्यात यावी, असे विनंती पत्र दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. त्यांच्या या पत्रामुळे तिवारी चर्चेत आले आहेत. तिवारी याच्या विनंतीनुसार १४ नोव्हेंबर रोजी साजरा होणार बालदिन 26 डिसेंबरला साजरा करण्यात यावा. कारण त्या दिवशी जर बालदिन साजरा केला तर शिखांचे 10 वे धर्मगुरू गुरुगोविंद सिंग यांच्या दोन मुलांना श्रद्धांजली देता येईल, असे म्हणणे तिवारी यांनी या पत्रात मांडले आहे.

‘अनेक लहान मुलांनी देशासाठी बलिदान दिले आहे. मात्र, गुरुगोविंद सिंग यांची दोन मुलं साहिबजादे जोरावर सिंग आणि साहिबजादे फतेह सिंग यांचे बलिदान सर्वोच्च आहे. 1705 साली सरहिंद येथे या दोघांनी धर्माची रक्षा करताना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे इतर मुलांना प्रेरणा मिळावी, यासाठी या दोघांच्या बलिदानाच्या दिवशी बालदिवस साजरा करण्यात यावा, अशी विनंती मनोज तिवारी यांनी पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान, दरवर्षी १४ नोव्हेंबर म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी बालदिन साजरा करण्यात येतो. यावर आता विरोधी पक्षाने आक्षेप घेतला आहे, त्यात आता दिल्लीतील निवडुकीच्या तोंडावर तिवारी यांनी हे पत्र मोदींना लिहिल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/