‘ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा, मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा’, नितेश राणेंचा सणसणीत टोला

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुका राज्यात नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकामध्ये महाविकास आघाडीने भाजपाला अनेक ठिकाणी धूळ चाखली. दरम्यान या निवडणुकाच्या निकालानंतर महाविकास आघाडी नेते मंडळी व भाजप नेते मंडळी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली. राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक निकालांमध्ये महाविकास आघाडीने भाजपला चितपट करत धक्का दिला. यश संपादन केलं. याच दरम्यान भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

ठीक आहे आम्ही कमी पडलो! भाजप नेते नितेश राणे यांचं ट्विट

“ठीक आहे आम्ही कमी पडलो! पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा… मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा.. बाकी मैदानात परत भेटूच !!”

पक्षांची ‘पॉवर’ जोखण्यात कमी पडलो तसेच विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला. भाजपा नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. मात्र आमच्या स्ट्रॅटेजीत चूक झाली असेल. तसेच तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ‘पॉवर’ किती असेल याबाबतचं आमचं आकलन चुकलं. अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

एक एकट्यानं आमच्याशी लढावं ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं आव्हान

भाजपच्या या पराभवाला तीन पक्षाची एकजूट कारणीभूत आहे. पुण्यात मतं खाणारा तिसरा ताकदीचा उमेदवार नसल्यामुळं भाजपला फटका बसला आहे.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकालांमध्ये आश्चर्यकारक काहीही नाही. तिघे-तिघे मिळून एकट्याशी लढल्यानंतर यापेक्षा वेगळं चित्र दिसणार नव्हतं. तरीही आम्ही जिद्दीने लढलो. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एकेकट्यानं लढावं. पण त्यांच्यात ती हिंमत नाही,’ अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.