जयपूर : वृत्तसंस्था – लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवीन लग्न झालेली नवरी घरातील दागिने घेऊन पसार झाल्याची घटना जयपुरमध्ये घडली आहे. नवीन नवरी ही प्रेमप्रकरणातून पसार झाली असून ती ‘लुटारू दुल्हन’ असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तिने तिच्या इतर तीन साथीदारांच्या मदतीने घरातील सर्व दागिने घालून पसार झाली. एवढेच नाहीतर तिने घरावर लावण्यात आलेल्या नावाच्या पाटीसोबत सेल्फी काढून आपल्या साथिदारांना घराचा पत्ता दिला होता.
जयपूर येथील मनिष गुप्ता यांचे लग्न २४ जून रोजी रिया या तरूणीसोबत झाले होते. मनिष हा मूकबधिर आहे. त्याला ऐकूही येत नाही आणि बोलताही येत नाही. बरेच दिवस झाले त्याचे लग्न जमत नव्हते. याचा फायदा घेऊन रियाच्या गँगनी मनिष सोबत लग्नाचे नाटक करून दोन लाख रुपयांचे दागिने चोरून नेले.
अनाथ असल्याची थाप
बनवारी आणि संजय या नावाच्या दोन व्यक्तींनी मनिषच्या कुटुंबीयांशी रियाच्या मावशी सोबत ओळख करून दिली. रिया आणि तिची बहीण अनाथ असल्याची थाप गिता या महिलेने सांगितले. त्यामुळे मुलीचे लवकर लग्न करायचे असल्याचे सांगून मनिष सोबत तिचे लग्न लावून दिले. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी रियाने घरातील सर्व दागिने घालून औषध आणायला जाते अशी थाप मारून घरातून बाहेर पडली. त्यावेळी एका टॅक्सीमध्ये तिचे इतर साथीदार तिची वाट पहात बसले होते. ती येताच सर्वांनी तेथून पलायन केले. मात्र, या घटनेमुळे गुप्ता कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
रंगांचा मानवी जीवनावर पडतो सखोल प्रभाव, जाणून घ्या सत्य
तुम्हाला नखे कुरतडण्याची सवय आहे का ? मग हे नक्की वाचा
आता स्वतःहूनच नष्ट होतील ‘कर्करोगाच्या’ पेशी
मेगाभरतीचा मार्ग अखेर मोकळा, कोणत्या विभागात किती पदे ?