COVID-19 : केंद्र सरकारनं ‘कोरोना’ व्हायरस कंट्रोल करणार्‍या ‘या’ 4 शहरांना सांगितलं रोल मॉडल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना विषाणूच्या प्रकरणांत झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने जयपूर, इंदोर, चेन्नई आणि बंगलोर या चार शहरांची कोविड -19 साथीवर नियंत्रण ठेवणारे रोल मॉडेल म्हणून ओळख पटविली आहे. गेल्या काही दिवसांत केंद्राने विविध नगरपालिकांच्या बैठका घेतल्या. त्यात कोविड – 19 चे व्यवस्थापन – सकारात्मक घटना हाताळण्याच्या प्रभावी सराव आणि मृत्यूदर कमी करण्याच्या बाबतीत चर्चा केली. अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. कोरोना विषाणूच्या घटनांवर नियंत्रण ठेवणारी शहरे म्हणून सरकारने इंदोर आणि जयपूरची ओळख पटवली आहे, तर चेन्नई आणि बेंगळुरूसारख्या प्रमुख शहरांची ओळख मृत्युदर कमी केल्याच्या बाबतीत पटवली आहे.

देशातील बर्‍याच महानगरपालिकांना सध्या प्रकरणे दुप्पट होण्याचा दर लवकर होणे, संक्रमणाचा उच्च दर, देशातील सरासरी मृत्यूच्या तुलनेत इथल्या मृतांची संख्या वाढणे यासारख्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. याव्यतिरिक्त कंटेनमेंट झोनमध्ये पेरिमीटर कन्ट्रोल , बफर झोनचे मॅपिंग आणि घर-घर पाळत ठेवणे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित केले जात आहे. शहरांच्या नगरपालिकेत झोपडपट्ट्या व इतर उच्च घनता असलेल्या क्षेत्रांमध्ये कोविड -19 व्यवस्थापनात जास्त धोका आहे.

इंदोर आणि जयपूरमध्ये घरोघरी सर्वेक्षण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात आहे. तसेच इंदोरमध्ये गल्ल्यांसाठी विशेष पेट्रोलिंग पथक स्थापन केले आहे, तर संसर्ग होण्याच्या संभाव्यतेला आळा घालण्यासाठी जयपूरमध्ये विविध भागात भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांना मर्यादित केले आहे. दुकाने व दुधाच्या केंद्रावर मोठ्या संख्येने लोक येत असल्याने पालिका कर्मचारी आणि स्थानिक पोलिस यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. येथे नियमितपणे सॅनिटायझेशन केले जाते.

याशिवाय बंगळुरू आणि चेन्नईमध्ये मृत्यूचे प्रमाण केवळ एक टक्के आहे तर देशातील सरासरी दर तीन टक्के आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोविड -19 रुग्णांच्या उपचाराबाबत या दोन दक्षिणेकडील शहरांनी एक उदाहरण ठेवले आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत बृहन्मुंबई नगरपालिकेने स्वीकारलेल्या रणनीतीचेही कौतुक झाले.