भारत-चीन तणाव : … तर भारताची 1962 पेक्षा देखील जास्त हानी करू, ‘ड्रॅगन’ची धमकी

पोलिसनामा ऑनलाईन – लडाखमधील गलवान खोर्‍यात झालेल्या संघर्षनानंतर निर्माण झालेला तणाव अद्यापही निवळला नाही. पुन्हा एकदा चीनकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात पुन्हा घुसखोरी करून परिस्थिती बदलण्याचा चिनी लष्कराचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. भारतीय लष्कराने यासंबंधी माहिती दिली आहे. दरम्यान चीनने भारताला स्पर्धेत गुंतण्याची इच्छा असेल तर 1962 पेक्षाही जास्त नुकसान करु अशी धमकी दिली आहे.

भारताने काल चिनी सैनिकांचा घुसखोरीचा डाव उधळल्यानंतर त्याच दिवशी चिनी सैन्यांच्या प्रवक्त्याकडून भारताने बिजिंगमधून सैन्य मागे घेण्याची मागणी केली. त्याशिवाय अनधिकृतपणे नियंत्रण रेषा ओलांडला असल्याचा आरोप केला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सैन्यांनी नियंत्रण रेषा पार केली नसल्याचाही दावा केला आहे. भारताकडूनच सर्वात प्रथम घुसखोरी प्रयत्न केला आणि संघर्षासही सुरुवात केली असा दावा केला आहे. शक्तिशाली चीनचा सामना करताना अमिरिकेतून याप्रकरणी काही पाठिंबा मिळेला या भ्रमात राहू नका अशीही पोकळ धमकी चीनने दिली आहे.पण जर भारताला संघर्ष करण्याची इच्छा असेल तर चीनकडे अधिक साधने आणि क्षमता आहे. जर भारताला लष्करी सामर्थ्य दाखवायचे असेल तर पिपल्स लिबरेशन आर्मी भारतीय लष्कराला 1962 मध्ये झाले त्यापेक्षाही जास्त नुकसान सहन करण्यास भाग पाडेल अशी धमकी चीनने दिली आहे.