‘ड्रग्ज अ‍ॅडिक्टला झाशीची राणी बोलताना लाज वाटली नव्हती का ?’ काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा भाजपाला संतप्त सवाल

पोलीसनामा ऑनलाईनः देशात अन्नदाता शेतक-यांचा सन्मान सर्वोतोपरी आहे. त्याला खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना साथ दिली. मुंबई पोलिसांना माफिया, मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अ‍ॅडिक्ट कंगना रणौतला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का? असा सवाल काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपाला केला आले.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे. शेतक-यांनी चक्का जामची हाक दिली आहे. गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक काळ दिल्ली सीमेवरील टिकरी, सिंघू आणि गाझीपूर येथे शेतकऱ्याचे आंदोलन सुरु आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमधील चर्चा 12 ते 13 वेळा निष्पळ ठरल्या असून भाजपा नेत्यांकडून शेतकरी विरोधी सूर लावला आहे. शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी संघटनांचा पाठिंबा असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला होता. त्यावरून बरंच वादंग निर्माण झाले होते. त्यानंतर प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावरूनही भाजपा नेत्यांनी आंदोलक शेतकऱ्यांवर टीका केली होती. यावरून काँग्रेस नेते सावंत यांनी भाजपाला खडे बोल सुनावले आहेत.