Coronavirus : ‘कोरोना’चा शेवट कधी होणार ? मिळालं उत्तर, ‘या’ महिन्यापर्यंत वाट पहावी लागणार

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – कोरोना विषाणूविरोधात सुरू असलेल्या लढाईत देशात परिस्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण सर्वांनाच एक प्रश्न आहे की, या प्राणघातक संसर्गापासून कधी मुक्ती मिळेल? आता याचे उत्तर सापडले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या तज्ञांनी एका गणितीय मॉडेलच्या आधारे असा निष्कर्ष काढला आहे की, सप्टेंबरच्या मध्यापर्यंत भारतातील कोरोना विषाणूचा अंत होईल. या आरोग्य शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, भारतात जेव्हा कोरोनामधून ठिक झालेल्या आणि कोरोना विषाणूमुळे बळी पडलेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रूग्णांच्या संख्येच्या बरोबर पोहचेल तेव्हा कोरोना विषाणू शिखरावर असेल. यानंतर रुग्णांची संख्या वेगाने कमी होईल आणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत, कोरोना भारतातून हळूहळू गायब होईल.

सध्या भारतात 1,15,942 सक्रिय प्रकरणे आहेत. म्हणजेच इतक्या रूग्णांवर देशातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर 1,14,072 रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. मृतांची संख्या 6642 आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयात उपमहासंचालक दिलीप कुमार आणि दीप्ती सहायक संचालक रुपाली राय यांनी ही गणना केली आहे. त्यांचा अभ्यास एपिडेमिओलॉजी इंटरनॅशनल या सायन्स मासिकामध्ये प्रकाशित झाला आहे.

भारतातील कोरोना विषाणूच्या स्थितीचा अंदाज लावण्यासाठी दोन्ही तज्ञांनी बॅले मॅथेमॅटिकल मॉडेलचा उपयोग केला आहे. या मॉडेल अंतर्गत, रोगाचा निष्कर्ष सक्रिय आणि बरे झालेल्या रूग्णांच्या आधारे निष्कर्ष काढला जातो. हे मॉडेल त्या आधारावर कार्य करते की जोपर्यंत एखाद्या रूग्णाला संसर्ग होतो तोपर्यंत तो नवीन लोकांना संक्रमित करू शकतो. अशा परिस्थितीत एकदा बरे झालेल्या आणि जीव गमावलेल्या लोकांची संख्या सक्रिय रूग्णांच्या संख्येपेक्षा जास्त झाली की, संसर्ग कमी होऊ लागतो.

दोन्ही शास्त्रज्ञांनी त्यांच्या विश्लेषणामध्ये असे म्हटले आहे की, भारतात 2 मार्चपासून साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि तेव्हापासूनच या घटनांमध्ये वाढ होत गेली आहे. त्यांच्या अभ्यासानुसार, सप्टेंबरच्या मध्यापर्यंत बरे झालेले आणि आपला जीव गमावलेल्या एकूण लोकांची संख्या सक्रिय रूग्णांच्या समकक्षापर्यंत पोहचेल. त्यानंतर महामारीचा प्रादुर्भाव कमी होईल. तथापि, हवामान आणि जमिनीची परिस्थिती (उदा. प्रवासी मजुरांचे स्थलांतर) या गणितांमध्ये देखील महत्त्वाचे मानले जाते.