खळबळजनक ! 10 वी च्या विद्यार्थ्याचा शाळेत मृत्यू
नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दहावीच्या विद्यार्थ्याचा शाळेत मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज (शुक्रवार) सकाळी नेरुळमध्ये घडला. त्याची प्रकृती ठिक नसल्याने चक्कर येऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे शाळेमध्ये खळबळ उडाली आहे.
सौम्य संजय भटनागर (वय-१५) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो नेरुळच्या पोदार शाळेत दहावीत शिकत होता. आज सकाळी तो नेहमीप्रमाणे शाळेत आला होता. त्यावेळी त्याला चक्कर आल्याने तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला तात्काळ डी.वाय.पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
सौम्य याची प्रकृती ठिक नसताना देखील तो शाळेत आला होता. त्यामुळे त्याला चक्कर आल्याने त्यातच मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एनआरआय पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
- ‘गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार
- बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार
- द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्ट करा ‘हे’ १० पदार्थ
- शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे
- गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!
- गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या
- कोणत्या आजारांपासून वाचण्यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्या
- हृदय विकाराला वयाची अट नसते : डॉ. ईश्वर झंवर
- ‘हे’ फळ नियमित खाल्ले तर बुद्धी, स्मृती आणि ज्ञानेंद्रियांची वाढते कार्यशक्ती
- रक्ताचा रंग लालच का असतो ? जाणून घ्या रक्तासंबंधी काही रंजक गोष्टी
- दारू पिल्यावर अनेक जण इंग्रजीत का बोलतात ? जाणून घ्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर