दिल्लीच्या निवडणूकीतून मिळाले ‘संदेश’, ज्यानं बिहारमध्ये होणार का भाजपाची ‘गोची’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीची राजकीय लढाई जिंकण्यासाठी भाजपाने आपली सर्व शक्ती पणाला लावली होती, परंतु भाजपाचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. दिल्ली निवडणुकीच्या निकालांचा राजकीय परिणाम या वर्षाच्या अखेरीस बिहारमधील निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या जेडीयूने भाजपबरोबर युती करुन निवडणूक लढविली होती. नितीश कुमार यांनी स्वत: बिहारी मतदार असलेल्या भागात भाजपच्या उमेदवाराच्या बाजूने प्रचार केला होता, पण कमळ फुलू शकले नाही.

भाजपाची हालत गंभीर
बिहारला लागून असलेल्या झारखंडमध्ये प्रथम भाजपाने सत्ता गमावली आणि आता दिल्लीत भाजपाला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. यावर्षी ऑक्टोबरमध्ये बिहारमध्ये देखील विधानसभा निवडणुका होणार आहेत. दरम्यान बिहारमध्ये आपल्या मित्रपक्ष जेडीयूच्या बरोबरीने जागा मिळवण्याची भाजपची योजना होती. पण दिल्लीच्या निवडणूक निकालांमुळे भाजपाचे गणित बिगडवले आहे.

गेल्या १४ महिन्यांपासून भाजपाचा हा सातवा पराभव असून भाजपाला एकूण पाच राज्यात आपली सत्ता गमवावी लागली आहे. विशेष म्हणजे बिहारमध्ये भाजपाकडे पाहिजे तसा मजबूत चेहरा नाही, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सलग पराभव झाल्यानंतर निश्चितच पक्षावर दबाव येईल आणि जेडीयूशी जास्त बोलण्याची स्थिती निर्माण होणार नाही. या निवडणुकीपूर्वी जेडीयू भाजपपेक्षा जास्त जागांची मागणी करत आहे. अशा परिस्थितीत भाजपाला जेडीयूच्या नेतृत्वात आणि त्याच्या अटींवर निवडणुका घेण्यास भाग पाडले जाईल, अशी परिस्थिती उद्भवली आहे.

बिहारमध्ये भाजपा दिल्लीसारखीच आक्रमक होईल का ?
दिल्ली निवडणुकीचे निकाल जरी भाजपाच्या बाजूने नसतील, परंतु दिल्ली निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपाची एकता बिहारच्या बाहेर दिसली. आता त्याचा परिणाम बिहारमध्ये पाहायला मिळणार आहे. जेडीयू भाजपाच्या ज्वलंत हिंदुत्वाचे वक्तव्य करणाऱ्या नेत्यांमुळे अस्वस्थ होते. जेव्हा त्याचा दिल्लीत काही परिणाम झाला नाही, तर बिहारमध्येही भाजपा हे मुद्दे टाळतील जेणेकरुन नितीशकुमार यांनाही अल्पसंख्याकांची मते मिळू शकतील.

नितीश कुमार यांच्या कामांचा काय फायदा होईल
केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये अशा अनेक घोषणा केल्या ज्यामुळे त्यांना निवडणुकीत राजकीय फायदा झाला. नितीशकुमार यांनीही अशा अनेक योजना राबवल्या आहेत. मुलींना सायकल, चोवीस तास वीज, दारू बंदी, प्रत्येक घरात नळ, चांगला रस्ता आणि पेन्शन योजना अशी त्यांची मोठी कामगिरी आहे, ज्याचा त्यांना राजकीय लाभ मिळू शकतो.

दिल्लीत लोकांनी विकासाच्या नावाखाली मतदान केले आणि बिहारमध्ये एनडीए नितीशच्या विकासाच्या नावावर मते मागण्याची तयारी करत आहे. यावरून हे स्पष्ट झाले आहे की विकासाचा अजेंडा म्हणून बिहार निवडणुकीत एनडीएचे मोठे हत्यार म्हणजे महागठबंधन हे आहे.

आरक्षणाच्या मुद्द्याने वाढू शकतात अडचणी
बिहारची निवडणूक विकासाबरोबरच जातीच्या समीकरणानेही लढविली जाते आणि सध्या बिहारमधील एनडीए जातीय समीकरणासह विरोधकांवर भारी आहे. परंतु पदोन्नतीतील आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे त्यामुळे भाजपाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो, कारण २०१५ मध्ये आरक्षणाचा मुद्दा भाजपाच्या पराभवाचे कारण बनला होता.