दिल्ली ‘अनाज’ मंडईत भीषण आग ! आत्तापर्यंत 43 जणांचा मृत्यू, PM नरेंद्र मोदी आणि CM केजरीवालांनी दुखः व्यक्त केलं
दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील भाजी मंडई परिसरात रविवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत 43 जणांचा गुदमरून आणि होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी 56 हून अधिक जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.
Prime Minister Narendra Modi: The fire in Delhi’s Anaj Mandi on Rani Jhansi Road is extremely horrific. My thoughts are with those who lost their loved ones. Wishing the injured a quick recovery. Authorities are providing all possible assistance at the site of the tragedy. pic.twitter.com/gK4z7nTJI5
— ANI (@ANI) December 8, 2019
राणी झाशी रोडवरील ‘अनाज’ मंडई भागातील घरांना रविवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीची घटना समजताच अग्निशामक दलाच्या 40 गाड्या घटनास्थळी पोहचून त्यांनी घरात अडकलेल्या सुमारे 56 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
Delhi CM Arvind Kejriwal on #delhifire, " Rescue operations are going on. Injured are being taken to hospitals". pic.twitter.com/byP7cjXLtw
— ANI (@ANI) December 8, 2019
अरुंद गल्ल्या आणि सकाळीच लागलेल्या आगीत अनेक जण झोपेत होते. त्यामुळे आग व धुरामुळे त्यांना घरातून बाहेर पडता आले नाही. अनेकांचा भाजून तसेच गुदमरुन मृत्यू झाला. आगीतून बाहेर काढलेल्या लोकांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून या आगीत 43 जणांचा मृत्यू झाला असून ही संख्या वाढू शकत असल्याचे येत आहे. आता या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असल्याचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी सुनिल चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शोक व्यक्त केला आहे.
Visit : Policenama.com
- दुधासोबत ‘या’ ४ गोष्टी कधीही खाऊ नका, हे आहेत ८ धोके, जाणून घ्या
- लसणाचे तेल लावल्यास दूर पळतील डास, ‘हे’ आहेत १० उपयोग
- शारीरिक कमजोरी, लठ्ठपणा दूर करण्यासाठी वेलची गुणकारी, ‘हे’ आहेत ७ उपयोग
- ‘शॉवर’खाली जास्त वेळ बसल्यास होतो ‘हा’ त्रास, या ४ गोष्टी लक्षात ठेवा
- ‘हे’ आहेत ८ चांगले-वाईट चरबीयुक्त पदार्थ, वजन राहील नियंत्रणात
- सूर्यप्रकाश व खेळत्या हवेअभावी वेगाने पसरतात टीबीचे जंतू, ‘या’ ७ प्रकारे घ्या काळजी
- नियमित नारळपाणी प्यायल्यास आजार राहतील दूर, ‘हे’ आहेत ५ फायदे !