Dilip Walse Patil | ‘न्यायालयीन निर्णयात भोंगे काढा असं कुठेही लिहिलेलं नाही’ – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dilip Walse Patil | राज्यात निर्माण झालेल्या भोंग्याच्या वादावरुन आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मोठं विधान केलं आहे. ‘न्यायालयीन निर्णयात भोंगे काढा असं कुठेही लिहिलेलं नाही, रात्री 10 ते सकाळी 6 लावू नये असं लिहिलेलं आहे,’ असं वक्तव्य त्यांनी केलं. यावेळी गृहमंत्री वळसे-पाटील हे मुंबईत (Mumbai) माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) देखील निशाणा साधला.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शनिवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. राज्यातील कायदा सूव्यवस्था यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहीती समजते. तर, वळसे पाटील म्हणाले की, ”ज्यांना जी प्रार्थना करायची आहे ती घरात करावी, मंदिरात करावी, उगाचच सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. भाजपने केवळ धार्मिक भावना पूढे करून प्रचार केला. परंतु त्यांना लोकांनी नाकारलं आहे,” असं वळसे पाटील म्हणाले.
दरम्यान पुढे वळसे पाटील म्हणाले, ”न्यायालयीन निर्णयात भोंगे काढा असं कुठेही लिहिलेलं नाही
रात्री 10 ते सकाळी 6 लावू नये असं लिहिलेलं आहे. महाराष्ट्र पोलीस मुस्लिम संघटनासोबत बोलणं करतं आहे
आणि त्यांना जे नियम आहेत त्याबाबत माहिती देण्यात येतं आहे. आमचं सर्व संघटनांसोबत बोलणं सुरू असल्याचं,” ते म्हणाले.
Web Title :- Dilip Walse Patil | court stated that from 10 pm till 6 am loudspeakers should not be played says maharashtra home minister dilip walse patil
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Anil Deshmukh | … तर अनिल देशमुखांना जामिनाचा मार्ग मोकळा; CBI ला कोर्टाचा मोठा झटका ?
- Hardik Pandya | काय सांगता ! होय,, हार्दिक पांड्याने IPL चं केलं लाखोंचं नुकसान, जाणून घ्या प्रकरण
- SBI Home Loan For Woman | महिलांसाठी स्वत:च्या घराचं स्वप्न होणार पूर्ण; SBI ने आणली खास ऑफर