शिवसेनेमध्ये निवडणुकांना महत्त्व नाही : आदित्य ठाकरे

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाइन – ‘काही पक्षांसाठी निवडणुका महत्त्वाच्या असतील, मात्र शिवसेनेसाठी नेहमीच लोकांची कामं आणि सुविधा महत्त्वाच्या आहेत’, असं म्हणत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. अंबरनाथ शहरात ऑलिम्पिक दर्जाचं शूटिंग रेंजचं उद्घाटन काल युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारताच्या प्रसिद्ध नेमबाज अंजली भागवत, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

अंबरनाथ शहरात ऑलिम्पिक दर्जाचं शूटिंग रेंज उभारण्यात आलं आहे. या शूटिंग रेंजचं उद्घाटन काल युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. शूटिंग रेंजचं उद्घाटन केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनाही रायफल आणि पिस्टल हाती घेऊन निशाणा साधण्याचा मोह आवरला नाही.

या कार्यक्रमासाठी शिवसेनेनं ‘आता निशाणा साधायचाच’ अशी बॅनरबाजी करत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत आदित्य ठाकरेंना विचारलं असता, काही पक्षांसाठी निवडणुका महत्त्वाच्या असतील, पण शिवसेनेसाठी लोकांची कामं महत्त्वाची आहेत, असं म्हणत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी भाजपवर नाव न घेता निशाणा साधला.

राज्यात भाजप- शिवसेना युतीचे सरकार आहे. दोन्ही पक्ष सत्तेत असतानाही निवडणुकीच्या तोंडावर सध्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. सध्या दोन्ही पक्षांनी निवडणुकीसाठी एकला चलो रे… चा नारा दिला आहे.  त्यामुळे युतीतील संबंध अधिकच ताणले गेले आहेत. त्याचे पडसाद त्यामुळे भाजप आणि शिवसेना असे एकमेकांवर निशाणे साधून टीका करताना दिसत आहेत.

लातूरच्या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसोबत युती झाली तर ठिकच, नाही झाली तर शिवसेनेला पटक देंगे असे वक्तव्य केले होते.

दिल्लीत शरद पवारांच्या घरी महाआघाडीच्या बैठकीत ‘हे’ ठरले