अंबरनाथ शहरात ऑलिम्पिक दर्जाचं शूटिंग रेंज उभारण्यात आलं आहे. या शूटिंग रेंजचं उद्घाटन काल युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. शूटिंग रेंजचं उद्घाटन केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनाही रायफल आणि पिस्टल हाती घेऊन निशाणा साधण्याचा मोह आवरला नाही.
या कार्यक्रमासाठी शिवसेनेनं ‘आता निशाणा साधायचाच’ अशी बॅनरबाजी करत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत आदित्य ठाकरेंना विचारलं असता, काही पक्षांसाठी निवडणुका महत्त्वाच्या असतील, पण शिवसेनेसाठी लोकांची कामं महत्त्वाची आहेत, असं म्हणत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी भाजपवर नाव न घेता निशाणा साधला.
लातूरच्या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसोबत युती झाली तर ठिकच, नाही झाली तर शिवसेनेला पटक देंगे असे वक्तव्य केले होते.