विधानसभा 2019 : काँग्रेसची 50 जणांची यादी तयार, ‘या’ दिवशी होणार जाहीर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीड जिल्ह्यातील पाच उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसने देखील 50 उमेदवारांची यादी तयार केली आहे. उमेदवारांची यादी 20 सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप पूर्ण झाले आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी 125 जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. तर उर्वरीत 38 जागा मित्र पक्षांना सोडण्यात आल्या आहेत.
Maharashtra Congress President, Balasaheb Thorat: The first list of 50 Congress candidates for Maharashtra Assembly elections will be out by September 20. (file pic) pic.twitter.com/SeZYS0yDGI
— ANI (@ANI) September 18, 2019
काँग्रेसच्या छाननी समितीची दिल्लीतील काँग्रेस वॉर रुममध्ये आज बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. आज झालेल्या बैठकीमध्ये 50 ते 60 उमेदवारांच्या नावांवरती अंतीम निर्णय घेण्यात आला. त्यापैकी 50 जणांची यादी तयार करण्यात आली असून ती शुक्रवारी (दि.20) जाहीर करण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत कमी नुकसान व्हावे यासाठी काँग्रेसने ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ला सुरुवात केली आहे. त्यासाठी दिल्लीमध्ये एक खास योजना आखण्यात आली असून राज्यातील दिग्गज नेत्यांना विधानसभा निवडणुका लढवण्याचे आदेश पक्ष श्रेष्ठींनी दिले असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. जे नेते कधी विधानसभा निवडणूक लढले नाहीत त्यांनाही मैदानात उतरविण्याचा काँग्रेसचा विचार आहे. मात्र हे नेते हा आदेश ऐकणार का हाच खरा प्रश्न आहे.
Visit – policenama.com
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा