नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन (सीएए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे ‘हिंदू जिना’ असल्याची टीका तरुण गोगोई यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्माच्या आधारे विभाजन करण्याचा मोहम्मद अली जिना यांचा ‘टू नेशन थिअरी’ राबवत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.
तरुण गोगोई म्हणाले की, “आम्ही (काँग्रेस) पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप पंतप्रधान आमच्यावर करतात. मात्र, त्यांनी स्वतःला जवळच्या देशाच्या पातळीपर्यंत खाली आणले आहे. ते जिना यांच्या दोन राष्ट्र या सिद्धांताकडे जात आहेत आणि भारताचे हिंदू जिना या रूपाने उदयास आले आहेत.” त्यांनी म्हटलं आहे की, “ज्याप्रकारे सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) वरुन देशभरात आंदोलन सुरु आहे, त्यावरुन लोकांनी भाजपा आणि त्यांच्या संघटनांची हिंदुत्त्व विचारसरणी नाकारली असल्याचं सिद्ध होत आहे. आम्ही हिंदू आहोत पण आपला देश हिंदू राष्ट्र होताना पाहण्याची इच्छा नाही. विरोध करणाऱ्यांमध्ये जास्त संख्या हिंदूंची आहे. जे भाजपा आणि आरएसएसच्या हिंदुत्त्वाविरोधात आहेत”.
तरुण गोगोई तीन वेळा आसामचे मुख्यमंत्री राहिले आहेत. गोगाई एनआरसी आणि सीएएवरुन केंद्र सरकारवर सतत निशाणा साधत आहेत. याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात एकही डिटेंशन सेंटर नसल्याच्या दावा करण्यावरुन टार्गेट केलं होतं. गोगोई यांनी नरेंद्र मोदी खोटं बोलत असून भाजपा सरकारने आसाममध्ये डिटेंशन सेंटर उभारण्यासाठी २०१८ मध्ये ४६ कोटींचा निधी जारी करण्याचा दावा केला आहे. याशिवाय, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये रविवारी (दि.५) विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याचाही तरुण गोगोई यांनी तीव्र निषेध केला आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- ‘फूड पॉयजनिंग’ कशामुळे होते? ‘ही’ आहेत 5 लक्षणे ?
- ‘फंगल इंन्फेक्शन’ दूर करण्यासाठी ‘या’ 2 प्रकारे करा कडूलिंबाचा वापर !
- मक्याच्या कणीसाचे ‘हे’ आहेत 4 फायदे, मात्र…त्यावर पाणी पीणे नुकसानदायक
- पचनक्रिया बिघडली असेल तर आहारात ‘या’ 7 गोष्टींचा करा समावेश
- तुम्हाला ऑफिसमध्ये सतत झोप येते का? ‘ही’ 4 कारणे असू शकतात !