धनगरांना आरक्षण द्या; नाहीतर सत्तेतून बाहेर पडा

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

धनगर समाजाला आरक्षण द्या, नाहीतर सत्तेतून बाहेर, असा सुर धनगर समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चात पाहायला मिळाला. धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाजाच्यावतीने पुण्यात बालगंधर्व चौकात मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी धनगर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

हा आमचा मोर्चा 225 वा असून हे भाजप सरकार धनगर समाजाचा आवाज दाबण्याचे काम करत असून, आम्ही या सरकारचा निषेध करतो व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की टिसचा अहवाल 30 ऑगस्ट 2018 रोजी येणार आहे. आज 18 दिवस होऊन गेले असतानाही अहवाल आला नाही. असं मत भारत अगेंस्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी व्यक्त केलं.

ज्या पवार घराण्याने धनगर समाजाच्या मताने देशाचे राजकारण केले त्यांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये उगाच समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी काहीही खटाटोप करू नये, अशी जोरदार टीकाही त्यांनी यावेळी पवारांवर केली.

मला माफ करा, माझी चुकी झाली : राम कदम

धनगर समाजाच्या विकासासाठी आम्ही महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभेच्या 180 जागा माळी,धनगर,मराठा मुस्लिम वंजारी मातंग,दलित आदी जातीं समूहाला घेऊन लढवणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

[amazon_link asins=’B0778JFC13,B011IRCV8C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e43b5fa5-ba7b-11e8-a6df-61c77e94f108′]