जम्मू काश्मीरमध्ये आज सुरु होणार सरकारी कार्यालये ; फोन सेवा सुरु करण्याचा होणार निर्णय
श्रीनगर : वृत्तसंस्था – स्वातंत्र्य दिन शांततेत पार पडल्यानंतर आता शुक्रवारपासून जम्मू काश्मीरमधील सरकारी कार्यालये सुरु होणार असून काश्मीर घाटीतील फोन सेवा पूर्ववत करण्याविषयीचा निर्णय आज घेण्यात येणार आहे. ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने ३७० कलम हटविल्याच्या अगोदर काश्मीरमध्ये जमावबंदी आदेश लागू केला होता. त्याचवेळी मोबाईल सेवाही बंद केली होती.
राज्यपाल सत्यपाल मलिकने गुरुवारी सायंकाळी सुरक्षा स्थितीची माहिती घेऊन सरकारी कार्यालये व अन्य कार्यालये सुरु करण्याचे आदेश दिले. आज जुम्मे की नमाजच्या दरम्यान सुरक्षेची समिक्षा केली जाईल. त्यानंतर सर्वसामान्य लोकांवरील प्रतिबंध मागे घेण्याचा विचार करण्यात येणार आहे.
तसेच काश्मीर घाटीत मोबाईल सेवा सुरु करण्याबाबत आज निर्णय घेण्यात येणार आहे. गेल्या पाच दिवसात काश्मीर घाटीत कोणतीही हिंसक घटना घडलेली नाही. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. गेल्या काही वर्षांमधील यंदा प्रथमच स्वातंत्र्य दिन काश्मीर घाटीत संपूर्ण शांतता होती. अमरनाथ यात्रेचा गुरुवारी अनौपचारिक समारोप करण्यात आला. यंदा ३० दिवसाच्या कमी कालावधीत ३ लाख ३० हजार भाविकांनी पवित्र अमरनाथ गुहेत जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले.
- सकाळपासून संध्याकाळपर्यंत फ्रेश राहण्यासाठी अवश्य करा ‘हे’ ५ उपाय
- हृदयरोग टाळण्यासाठी करा ‘हा’ जबरदस्त उपाय, २१ दिवसात पडतो फरक
- विविधि फुलांमध्ये सुध्दा असतात औषधी गुणधर्म, ‘हे’ रामबाण उपाय जाणून घ्या
- खुर्चीवर बसून करा व्यायाम, जिममध्ये जाण्याची गरज नाही, होतील ‘हे’ फायदे
- उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण उपाय, अवश्य करा
- महिलांनी ‘या’ हार्मोनल असंतुलनाच्या संकेताकडे करु नये दुर्लंक्ष, अन्यथा होतील दुष्परिणाम
- वजन वाढू नये म्हणून महिलांनी घ्यावी ‘ही’ काळजी, होतील ‘हे’ फायदे
- ‘या’ ५ गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लंक्ष, आरोग्याला होऊ शकते नुकसान
- काही दिवसातच वाढेल स्पर्म क्वालिटी, फक्त ‘या’ पदार्थाचे करा सेवन
- कानात लपलेले असू शकतात ‘या’ ५ आजारांचे संकेत, कसे ओळखाल, जाणून घ्या