पुणे-मुंबईसह देशातील 15 शहरांमध्ये ‘हाय अलर्ट’, गुप्तचर यंत्रणांनी वर्तविली ‘या’ 2 दिवशी घातपाताची शक्यता

नवी दिल्ली : केंद्र सरकारने काश्मीरविषयी कलम ३७० हटविण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा पथकांवरील हल्ले वाढवण्याबरोबरच आता देशातील प्रमुख शहरांनाही लक्ष्य करु शकते अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिली आहे. बकरी ईद आणि स्वातंत्र्य दिन या २ दिवशी देशात मोठा घातपाताची होण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणा आयबीने दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गुप्तचे यंत्रणेच्या या माहितीनंतर मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशातील महत्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून देशातील एकूण १५ मोठ्या शहरांमध्ये हायल अलर्ट जारी कऱण्यात आला आहे. येत्या आठवड्यात देशात २ मोठे उत्सव असून यावेळी तपास यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

मुंबईवर जैश-ए-मोहम्मद च्या हल्ल्याची वर्तवली होती शक्यता :
२६/११ च्या महाभयंकर हल्लानंतर आता पुन्हा एकदा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याचा अंदाज गुप्तचर संस्थांनी दोनच दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. जैशच्या तीन जणांच्या टीमवर मुंबई हल्ल्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकणार असून यासाठी पाकिस्तान आपल्या स्लीपर सेलला सक्रीय करेल असा गुप्तचर यंत्रणांचाचा अंदाज आहे. यंत्रणांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर केंद्राने राज्य पोलिसांना महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या असून सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर नियोजन केले जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त