भजी तळण्यावरून पतिपत्नीचे भांडण ; बेतले सासूच्या जीवावर 

नवी दिल्ली :पोलीसनामा ऑनलाईन

सासू आपल्या घरी राहत असल्याचा राग असणाऱ्या जावयाने  शुल्लक कारणावरून सासूची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे केवळ भजी तळण्याच्या कारणावरून जावयाने सासूची हत्या केली. सासूची हत्या करून पळ काढणाऱ्या या जावयाला पोलिसांनी उत्तर प्रदेशात गाझीपूरमधील शेतांमध्ये  १० किलो मीटर पर्यंत पाठलाग करून पकडलं.

[amazon_link asins=’B07811ZTKF,B07811BTY8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’aaccb664-bbd9-11e8-9f1f-917b8aeb9cd6′]

दिल्लीच्या रामपुरात राहणाऱ्या आरोपी अफरोजचा  मागच्या वर्षी शाइस्ता हिच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांनी त्याची सासू फौजिदा ही घरी आली आणि त्यांच्यासोबत राहू लागली. सासू तिथेच राहू लागल्याच्या कारणावरून अफरोज आपल्या पत्नीशी सतत वाद घालत होता.
सदर घटना घडली त्या दिवशी शाइस्ताने सर्वांसाठी भजी बनवली होती. संध्याकाळी घरी परतल्यानंतर अफरोजला शाइस्ताने भजी दिली. पण भजी गरम नसल्याने अफरोज आणि शाइस्तामध्ये भांडण झालं. त्यांचं भांडण सोडवण्यासाठी सासू फौजिदा या मध्ये पडल्या. यावेळी अफरोजने सासूवर चाकूने सपासप अनेक वार केले. पत्नी शाइस्ताने अफरोजला अडवलं. तर तिलाही त्याने चाकूने भोसकलं आणि फरार झाला. त्यानंतर पोलीस त्याच्या मागावर होते.
 
पोलिसांनी  अफरोजला पाठलाग सुरु केला व त्याला  शरण येण्याचं आवाहन केलं. पण गावावर हल्ला झाल्याचं ओरडत तो शोतातून पळू लागला. त्याचं आरोळी ऐकून गावकरी पोलिसांच्या पाठीमागे लागले. पण अफरोज हा हत्या करून पळाला असल्याचं पोलिसांनी गावकऱ्यांना सांगितलं. त्यानंतर १० किलोमीटरपर्यंत पाठलाग केल्यावर पोलिसांनी अफरोजला अटक केली. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.