[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’21961b76-c91d-11e8-a2db-c1fde78c097c’]
भाजप लोकसभेसाठी सेलिब्रेटींना उतरवणार निवडणुक रिंगणात
आगामी लोकसभा निवडणूक ही विरोधी पक्षांसाठी दोन टप्प्यांची प्रक्रिया असेल. पहिल्या टप्प्यात भाजपला पराभूत करणे हेच आमचे लक्ष्य असेल. त्यात यश मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान कोणाला करायचे, याविषयी निर्णय घेतला जाईल. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भरघोस यश मिळेल. आजच्या घडीला दोन समस्या आहेत. पहिली नोकऱ्या नाहीत आणि दुसरी म्हणजे छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना सरकारने लक्ष्य केले जात आहे. आखाती देशांमध्ये तेलामुळे जशी समृद्धी आली, तशीच समृद्धी भारतात वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रातील सेवा उपलब्ध केल्याने येऊ शकते, असेही राहुल म्हणाले. मायावतींच्या पक्षासोबत राज्य आणि केंद्राच्या पातळीवर युतीचे प्रयत्न सुरू असताना बसपने अचानक युती तोडण्याचा निर्णय जाहीर केला. युती झाली असती तर चांगले झाले असते. पण त्यामुळे मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये फरक पडणार नाही आणि आमचा विजय होईल. राजस्थान आणि तेलंगणमध्ये तर काँग्रेस विजयी होणारच आहे. मायावतींच्या पक्ष लोकसभा निवडणुकीत सोबत येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’de4b6e6f-c91d-11e8-b7ef-6d08e24e043f’]